शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नाशिकमधील मनपा गाळेधारकांचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:24 IST

बैठकीची प्रतीक्षा : सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष

ठळक मुद्देसमिती स्थापन झाल्यापासून अद्याप एकदाही बैठक झालेली नाहीदरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे

नाशिक - महापालिकेच्या गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार करण्यात आलेल्या भाडेवाढीबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने निर्णय घेण्याची सूचना नगरविकास राज्यमंत्र्यांनी केल्याने आता समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून असणार आहे. समिती स्थापन झाल्यापासून अद्याप एकदाही बैठक झालेली नाही. आता समितीच्या हाती निर्णय असल्याने गाळेधारकांना बैठकीची प्रतीक्षा आहे.महापालिकेने आपल्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अडीच वर्षांपूर्वी रेडीरेकनरनुसार भाडेदरवाढ केली होती. सदर दरवाढ ही अन्याय्य असल्याचे सांगत गाळेधारकांच्या संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. सदर दरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून संघटना लढा देत आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१७) मंत्रालयात आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे गाळेधारकांसमवेत बैठक होऊन चर्चा झाली होती. या चर्चेत महापालिकेत सदर प्रश्नी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याचे परंतु, अद्याप समितीची एकही बैठक झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे, नगरविकास राज्यमंत्र्यांनी सदरचा प्रश्न समितीच्या पातळीवरच सोडविण्याच्या सूचना महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहे. एका अशासकीय पत्रावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली असून त्यात उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती आणि सर्व पक्षांचे गटनेते यांचा समावेश आहे तर सदस्य सचिव म्हणून नगरसचिवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता समितीच्या हाती गाळेभाडेवाढीबाबतचा निर्णय असल्याने समितीच्या पहिल्या-वहिल्या बैठकीची प्रतीक्षा गाळेधारकांना लागून आहे....तर लिलावाची शक्यता!महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीने गाळेभाडेवाढीबाबतचा निर्णय घेऊन त्याला महासभेची मंजुरी मिळवायची आहे. महासभेकडून भाडेवाढीबाबत जो काही निर्णय होईल, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, महासभेने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आयुक्तांनी तो विखंडनासाठी शासनाकडे पाठविला. शासनाने तो मंजूर केला तर गाळ्यांसंबंधीचा जो मूळ प्रस्ताव लिलावासंदर्भातील आहे, तो लागू होऊ शकतो. परिणामी, गाळेधारकांना पुन्हा लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका