शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

नाशिकमधील मनपा गाळेधारकांचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:24 IST

बैठकीची प्रतीक्षा : सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष

ठळक मुद्देसमिती स्थापन झाल्यापासून अद्याप एकदाही बैठक झालेली नाहीदरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे

नाशिक - महापालिकेच्या गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार करण्यात आलेल्या भाडेवाढीबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने निर्णय घेण्याची सूचना नगरविकास राज्यमंत्र्यांनी केल्याने आता समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून असणार आहे. समिती स्थापन झाल्यापासून अद्याप एकदाही बैठक झालेली नाही. आता समितीच्या हाती निर्णय असल्याने गाळेधारकांना बैठकीची प्रतीक्षा आहे.महापालिकेने आपल्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अडीच वर्षांपूर्वी रेडीरेकनरनुसार भाडेदरवाढ केली होती. सदर दरवाढ ही अन्याय्य असल्याचे सांगत गाळेधारकांच्या संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. सदर दरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून संघटना लढा देत आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१७) मंत्रालयात आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे गाळेधारकांसमवेत बैठक होऊन चर्चा झाली होती. या चर्चेत महापालिकेत सदर प्रश्नी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याचे परंतु, अद्याप समितीची एकही बैठक झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे, नगरविकास राज्यमंत्र्यांनी सदरचा प्रश्न समितीच्या पातळीवरच सोडविण्याच्या सूचना महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहे. एका अशासकीय पत्रावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली असून त्यात उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती आणि सर्व पक्षांचे गटनेते यांचा समावेश आहे तर सदस्य सचिव म्हणून नगरसचिवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता समितीच्या हाती गाळेभाडेवाढीबाबतचा निर्णय असल्याने समितीच्या पहिल्या-वहिल्या बैठकीची प्रतीक्षा गाळेधारकांना लागून आहे....तर लिलावाची शक्यता!महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीने गाळेभाडेवाढीबाबतचा निर्णय घेऊन त्याला महासभेची मंजुरी मिळवायची आहे. महासभेकडून भाडेवाढीबाबत जो काही निर्णय होईल, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, महासभेने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आयुक्तांनी तो विखंडनासाठी शासनाकडे पाठविला. शासनाने तो मंजूर केला तर गाळ्यांसंबंधीचा जो मूळ प्रस्ताव लिलावासंदर्भातील आहे, तो लागू होऊ शकतो. परिणामी, गाळेधारकांना पुन्हा लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका