शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

निम्मे तळेगाव अद्याप अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:12 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

विल्होळी : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.अंजनेरी तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून अर्ध्या गावात वीजपुरवठा खंडित असून, वीज कंपनीचे अधिकारी वीजपुरवठा चालू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अर्धे गाव पूर्णपणे अंधारात असून, त्याबाबत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या.दलित वस्तीतील एक विद्युत खांब पूर्णपणे सडला असून, तो कोण्यातही क्षणी पाऊस, वाºयामुळे कोसळण्याची शक्यता आहे. सदर वीज पोलमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून त्याला लागूनच असलेल्या शाळेला गेल्या महिन्याभरापासून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तक्रार करून उपयोग होत नाही, पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही, असे उघडपणे सांगितले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बहुतांशी घरांमध्ये वीज नसल्यामुळे त्याचा अन्य घटकांवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत आहे.येत्या आठवडाभरात ठरावानुसार कार्यवाही करावी अन्यथा तळेगावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ खंबाळे विद्युत केंद्रावर आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला.या ग्रामसभेत सरपंच मंगल निंबेकर, उपसरपंच त्र्यंबक पगार, तुकाराम दाते, वामन दाते, रामदास पगार, प्रवीण दाते, संतोष निंबेकर, रामदास दाते, निवृत्ती पगार, योगेश पगार, सोमनाथ दाते, रामभाऊ दाते, ग्रामसेवक आहिरे, महिला बचत गट, पोलीस पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांना ठरावाचे निवेदन पाठविलेवीज कर्मचाºयांकडून गावाला विचारात न घेता किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता काही व्यावसायिकांना बेकायदेशीर वीज जोडणी करून दिली आहे. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करणाºया अधिकाºयांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व एक महिन्यापासून बंद असलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशा ठरावाचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन