शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

निम्मे तळेगाव अद्याप अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:12 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

विल्होळी : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात असून, यासंदर्भात वीज कंपनीकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून अखेर ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.अंजनेरी तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून अर्ध्या गावात वीजपुरवठा खंडित असून, वीज कंपनीचे अधिकारी वीजपुरवठा चालू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अर्धे गाव पूर्णपणे अंधारात असून, त्याबाबत वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या.दलित वस्तीतील एक विद्युत खांब पूर्णपणे सडला असून, तो कोण्यातही क्षणी पाऊस, वाºयामुळे कोसळण्याची शक्यता आहे. सदर वीज पोलमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून त्याला लागूनच असलेल्या शाळेला गेल्या महिन्याभरापासून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तक्रार करून उपयोग होत नाही, पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही, असे उघडपणे सांगितले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बहुतांशी घरांमध्ये वीज नसल्यामुळे त्याचा अन्य घटकांवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत आहे.येत्या आठवडाभरात ठरावानुसार कार्यवाही करावी अन्यथा तळेगावातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ खंबाळे विद्युत केंद्रावर आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला.या ग्रामसभेत सरपंच मंगल निंबेकर, उपसरपंच त्र्यंबक पगार, तुकाराम दाते, वामन दाते, रामदास पगार, प्रवीण दाते, संतोष निंबेकर, रामदास दाते, निवृत्ती पगार, योगेश पगार, सोमनाथ दाते, रामभाऊ दाते, ग्रामसेवक आहिरे, महिला बचत गट, पोलीस पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांना ठरावाचे निवेदन पाठविलेवीज कर्मचाºयांकडून गावाला विचारात न घेता किंवा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता काही व्यावसायिकांना बेकायदेशीर वीज जोडणी करून दिली आहे. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. वीजपुरवठा खंडित करणाºया अधिकाºयांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व एक महिन्यापासून बंद असलेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशा ठरावाचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन