शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

अर्धे शहर पाच तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:40 AM

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाड : करंट ट्रान्सफार्मरला आग; पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीतशहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.उन्हामुळे नाशिककर हैराण झालेले असतानाच सायंकाळी विजेअभावी रस्त्यावरील पथदीप व घरातील दिवेही बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शहर विभाग-१ अंतर्गत येणाऱ्या टाकळी सबस्टेशन येथे सायंकाळी करंट ट्रान्सफार्मर (सीटी)ला आग लागल्यामुळे अनेक फिडर्सवरील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे सीबीएस, शालिमार, एम.जी.रोड, गंगापूररोड आणि शरणपूररोडचा काही परिसर, गंजमाळ, द्वारका, काठेगल्ली , जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ खंडित होता.सिडको, सातपूरला वीज गायबसायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यामुळे सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटीसह परिसरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. टाकळी येथील केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे निम्मे शहर अंधारात असताना सायंकाळी झालेल्या पावसामुळेदेखील अनेक भागांतील खंडित वीजपुरवठ्याने त्यात भर पडली.दोन्ही विभागातील फिडर्स प्रभावित सिटीला लागलेल्या आगीमुळे शहरातील बहुतांश भागातील फिडर्सला वीजपुरवठा होऊ न शकल्याने या फिडर्सवरील वीजग्राहकांचादेखील वीजपुरवठा खंडित झाला. शहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला.सायंकाळच्या सुमारास ऐन बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. तर रहिवासी क्षेत्रातही वीज गायब झाल्याने नागरिकांना वीज कंपनीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली. परंतु नेहमीप्रमाणेच ग्राहकांना कुठूनही पुरेशी माहिती मिळत नसल्याने वीज कधी येणार याची वाट ग्राहकांना रात्री १० वाजेपर्यंत पहावी लागली. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.