शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

गारपिटीने शेतकरी धास्तावला

By admin | Updated: March 1, 2016 23:20 IST

बेमोसमी पाऊस : वटार, भालूर परिसरात लग्नमंडपात पाणी, कांदा, द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान

 मनमाडष्/वणी : गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गतवर्षी गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या दुष्काळात पाण्याचे टॅँकर आणून वाचविलेले द्राक्षबाग आणि अन्य पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. परिसरासह दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर येथे सोमवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे मनमाड शहरातील नागरिकांची धांदल उडाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची पळापळ झाली. भालूर, एकवई, धनेर, नवसारीसह परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. परिसरातील भालूर, एकवई, धनेर, नवसारी गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन प्रचंड पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतांमध्ये गारांचा खच पडला होेता. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.अशा प्रकारची गारपीट होऊ नये म्हणून चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई आदि परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. अशाच प्रकारच्या गारपिटीमुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला होता. यंदाच्या दुष्काळात कशीबशी द्राक्ष वाचविली आहेत.यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या पावसामुळे कांद्याचे पीक शेतात आडवे झाले आहे. काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्यावर गारपीट झाल्याने कांद्याच्या पातीची शेंडे खुडले गेल्यामुळे पीक संपूर्ण नष्ट होण्याची वेळ आली आहे. अचानक गारपिटीसह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.लग्नमुहूर्त असल्याने अनेक ठिकाणी सुरू असलेले हळदी आदि कार्यक्रमात अचानक आलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मांडवात उघड्यावर लग्न लावण्यात येते. या पावसामुळे विवाहसोहळा असलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.ओझर : शहरासह परिसरात काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु आंबा, द्राक्षांसह अन्य पिकांसाठी मात्र हा पाऊस व ढगाळ हवामान नुकसानकारक असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान निर्माण होऊन जोरदार वारे वाहत होते. अचानक झालेल्या वातावरणातील या बदलाने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीकाळ दिलासा मिळाला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक काही भागात पावसाने तुफानी तडाखा दिला. ओझर,टाऊनशिपसह पिंपळगावलाही तुफान पाऊस झाला. द्राक्षबागांवर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकरी धास्तावला आहे. नाशिकशहरासह भगूर, नाशिकरोड, वडाळागाव, सातपूर आदि भागात पावसाने काही काळ जोरदार हजेरी लावली. गेल्या दोनदिवसांत राज्यातील काही भागात विशेषत: विदर्भातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू, हरभरा, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात असा पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा आदि पिकांचे नुकसान होऊ शकते. (लोकमत चमू)