शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने शेतकरी धास्तावला

By admin | Updated: March 1, 2016 23:20 IST

बेमोसमी पाऊस : वटार, भालूर परिसरात लग्नमंडपात पाणी, कांदा, द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान

 मनमाडष्/वणी : गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि गतवर्षी गारांचा मारा यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या दुष्काळात पाण्याचे टॅँकर आणून वाचविलेले द्राक्षबाग आणि अन्य पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. परिसरासह दिंडोरी, वणी, पिंपळगाव, भालूर येथे सोमवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे मनमाड शहरातील नागरिकांची धांदल उडाली. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची पळापळ झाली. भालूर, एकवई, धनेर, नवसारीसह परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. परिसरातील भालूर, एकवई, धनेर, नवसारी गावांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन प्रचंड पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतांमध्ये गारांचा खच पडला होेता. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा निर्यात होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला आहे.अशा प्रकारची गारपीट होऊ नये म्हणून चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव, वडाळीभोई आदि परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. अशाच प्रकारच्या गारपिटीमुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला होता. यंदाच्या दुष्काळात कशीबशी द्राक्ष वाचविली आहेत.यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या पावसामुळे कांद्याचे पीक शेतात आडवे झाले आहे. काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्यावर गारपीट झाल्याने कांद्याच्या पातीची शेंडे खुडले गेल्यामुळे पीक संपूर्ण नष्ट होण्याची वेळ आली आहे. अचानक गारपिटीसह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.लग्नमुहूर्त असल्याने अनेक ठिकाणी सुरू असलेले हळदी आदि कार्यक्रमात अचानक आलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मांडवात उघड्यावर लग्न लावण्यात येते. या पावसामुळे विवाहसोहळा असलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.ओझर : शहरासह परिसरात काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु आंबा, द्राक्षांसह अन्य पिकांसाठी मात्र हा पाऊस व ढगाळ हवामान नुकसानकारक असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात ढगाळ हवामान निर्माण होऊन जोरदार वारे वाहत होते. अचानक झालेल्या वातावरणातील या बदलाने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीकाळ दिलासा मिळाला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक काही भागात पावसाने तुफानी तडाखा दिला. ओझर,टाऊनशिपसह पिंपळगावलाही तुफान पाऊस झाला. द्राक्षबागांवर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकरी धास्तावला आहे. नाशिकशहरासह भगूर, नाशिकरोड, वडाळागाव, सातपूर आदि भागात पावसाने काही काळ जोरदार हजेरी लावली. गेल्या दोनदिवसांत राज्यातील काही भागात विशेषत: विदर्भातील वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू, हरभरा, संत्रा या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात असा पाऊस झाल्यास द्राक्ष, कांदा आदि पिकांचे नुकसान होऊ शकते. (लोकमत चमू)