शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गुळवंच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली समांतर पाणी योजनेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 18:36 IST

सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या समांतर पाणी योजनेची गुळवंच येथील पथकाने पाहणी केली. गुळवंचलाही अशाच प्रकारची योजना ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी योजनेचा अभ्यास केला. पाटोळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी योजनेची माहिती दिली.

सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या समांतर पाणी योजनेची गुळवंच येथील पथकाने पाहणी केली. गुळवंचलाही अशाच प्रकारची योजना ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी योजनेचा अभ्यास केला. पाटोळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी योजनेची माहिती दिली.गुळवंचचे सरपंच केशव कांगणे, उपसरपंच भाऊदास शिरसाठ , ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे, सदस्य संतोष कांगणे, भगवान सानप, समाधान कांगणे यांनी पाटोळे गावात येऊन येथील बहुचर्चित समांतर पाणी योजनेची पाहणी करत समाधान व्यक्त केले. यावेळी पास्ते येथील ग्रामसेवक जे.एस. साखरे उपस्थित होते.त्यांच्या गावातील महिला वर्गाची पाण्यासाठीची होणारी वणवण पाहता,पाण्याची उपलब्धता व गरज ओळखून अभ्यासपूर्ण नियोजन करत समांतर पाणी योजना राबवली. गावास वेळेवर सहजरीत्या सर्वांना सारखे पाणी मिळत असल्याने गावकरी समाधानी आहेत. विशेषत: महिला वर्गाकडून या योजनेचे विशेष कौतुक होत असल्याने इंजिनियर मेघराज आव्हाड यांची सांगितले.आटकवडे येथेही पाटोळे गावाच्या धर्तीवर समांतर पाणी योजना सुरू केली आहे. गुळवंच गावात पाण्याचे दोन जलकुंभ असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत असल्याने समांतर पाणी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पदाधिकाºयांनी पाणी योजनेची माहिती घेतली.लवकरच गुळवंच गावातही अशीच योजना सुरू करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे यांनी सांगितले. पाटोळे येथील योजनेनतंर आटकवडे, धोंडवीरनगर येथे योजना राबविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी