शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चारा छावणीच्या अनामतीबाबत पालक सचिव अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:03 IST

दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमेची अटच या छावण्या सुरू होण्यात मोठा अडचणीच्या ठरल्यामुळे चारा छावण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा मागवाव्या लागल्या.

नाशिक : दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमेची अटच या छावण्या सुरू होण्यात मोठा अडचणीच्या ठरल्यामुळे चारा छावण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा मागवाव्या लागल्या. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नसताना, छावणीसाठी शासनाने दहा लाखांच्या अनामत रक्कम निश्चितच केली नसल्याचा धक्कादायक खुलासा पालक सचिव सीताराम कुंटे यांनी करून एक प्रकारे चारा छावण्या सुरू न होण्यामागे जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचे सूचित केले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचे सांगणाऱ्या कुंटे यांनी मात्र त्यावर मात करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सांगितली नाही.जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करून शुक्रवारी कुंटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या सिन्नर तालुक्यातील दौºयात आलेले अनुभव कथन करतानाच, जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना ंबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्णात चारा छावण्यांचे प्रस्ताव आल्याने सात छावण्या सुरू होतील, असे सांगितले. त्यावर चारा छावण्यांसाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम शासनाने ठरविलेली नसल्याचे त्यांनी सांगतात, ही रक्कम कोणी ठरविली, असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी चारा, पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बारकोडिंग आदी व्यवस्था छावणीत करावी लागणार असल्यामुळेच ही रक्कम निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. परंतु जादा अनामत ठेवल्यामुळे चारा छावण्या सुरू होत नसल्याच्या वृत्ताचे कुंटे यांनी खंडण केले. जिल्ह्णात किती पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली यावर कुंटे यांना माहिती देता आली नाही, मात्र जिल्ह्यातील टंचाईची गंभीर परिस्थिती पाहता, शासनाने ९३० गावांमध्ये टंचाई घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. या टंचाईग्रस्त गावांमध्ये भविष्यात टंचाई भासू नये यावर ठोस उपाययोजना काय असे विचारले असता, त्याचे उत्तर देण्याचे टाळण्यात आले, मात्र टंचाई कृती आराखड्याचे दोन टप्पे संपुष्टात येऊनही प्रशासनाकडून निव्वळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याच्या प्रश्नावर सारेच निरुत्तर झाले. टंचाई कृती आराखड्याच्या आधारे टंचाईच्या उपाययोजना केल्या जात असताना जिल्ह्यातील काही वाड्या, वस्त्यांमध्ये महिलांना धोकेदायक विहिरीत उतरून पाणी का भरावे लागते या प्रश्नावरही प्रशासनातील अधिकाºयांनी मौन पाळले. जिल्ह्णात रोजगार हमी योजनेचे एक हजार कामे सुरू असून, त्यावर ४० हजार मजूर काम करीत असल्याचे तसेच सेल्फवर सोळा हजार कामे असल्याचे कुंटे यांनी यावेळी सांगितले.यंदा कांद्याचे उत्पादन घटणारपालक सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकाºयांच्या घेतलेल्या आढावा बैठकीचा हवाला देत, यंदा कांद्याच्या उत्पादनात जवळपास २५ टक्के फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली. पाण्याची कमतरता हेच कारण असून, त्याचा फटका उन्हाळी कांद्याला बसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फळबागा म्हणजेच द्राक्ष व डाळिंबाच्या बागा वाचविण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले असून, कृषी खात्याच्या मदतीने द्राक्ष व डाळिंबबागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळGovernmentसरकार