शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

चारा छावणीच्या अनामतीबाबत पालक सचिव अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:03 IST

दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमेची अटच या छावण्या सुरू होण्यात मोठा अडचणीच्या ठरल्यामुळे चारा छावण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा मागवाव्या लागल्या.

नाशिक : दुष्काळी स्थितीत चारा छावण्या सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमेची अटच या छावण्या सुरू होण्यात मोठा अडचणीच्या ठरल्यामुळे चारा छावण्यांसाठी प्रशासनाला वारंवार निविदा मागवाव्या लागल्या. परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नसताना, छावणीसाठी शासनाने दहा लाखांच्या अनामत रक्कम निश्चितच केली नसल्याचा धक्कादायक खुलासा पालक सचिव सीताराम कुंटे यांनी करून एक प्रकारे चारा छावण्या सुरू न होण्यामागे जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचे सूचित केले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचे सांगणाऱ्या कुंटे यांनी मात्र त्यावर मात करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सांगितली नाही.जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करून शुक्रवारी कुंटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या सिन्नर तालुक्यातील दौºयात आलेले अनुभव कथन करतानाच, जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना ंबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्णात चारा छावण्यांचे प्रस्ताव आल्याने सात छावण्या सुरू होतील, असे सांगितले. त्यावर चारा छावण्यांसाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम शासनाने ठरविलेली नसल्याचे त्यांनी सांगतात, ही रक्कम कोणी ठरविली, असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी चारा, पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बारकोडिंग आदी व्यवस्था छावणीत करावी लागणार असल्यामुळेच ही रक्कम निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. परंतु जादा अनामत ठेवल्यामुळे चारा छावण्या सुरू होत नसल्याच्या वृत्ताचे कुंटे यांनी खंडण केले. जिल्ह्णात किती पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली यावर कुंटे यांना माहिती देता आली नाही, मात्र जिल्ह्यातील टंचाईची गंभीर परिस्थिती पाहता, शासनाने ९३० गावांमध्ये टंचाई घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. या टंचाईग्रस्त गावांमध्ये भविष्यात टंचाई भासू नये यावर ठोस उपाययोजना काय असे विचारले असता, त्याचे उत्तर देण्याचे टाळण्यात आले, मात्र टंचाई कृती आराखड्याचे दोन टप्पे संपुष्टात येऊनही प्रशासनाकडून निव्वळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याच्या प्रश्नावर सारेच निरुत्तर झाले. टंचाई कृती आराखड्याच्या आधारे टंचाईच्या उपाययोजना केल्या जात असताना जिल्ह्यातील काही वाड्या, वस्त्यांमध्ये महिलांना धोकेदायक विहिरीत उतरून पाणी का भरावे लागते या प्रश्नावरही प्रशासनातील अधिकाºयांनी मौन पाळले. जिल्ह्णात रोजगार हमी योजनेचे एक हजार कामे सुरू असून, त्यावर ४० हजार मजूर काम करीत असल्याचे तसेच सेल्फवर सोळा हजार कामे असल्याचे कुंटे यांनी यावेळी सांगितले.यंदा कांद्याचे उत्पादन घटणारपालक सचिव सीताराम कुंटे यांनी अधिकाºयांच्या घेतलेल्या आढावा बैठकीचा हवाला देत, यंदा कांद्याच्या उत्पादनात जवळपास २५ टक्के फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली. पाण्याची कमतरता हेच कारण असून, त्याचा फटका उन्हाळी कांद्याला बसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फळबागा म्हणजेच द्राक्ष व डाळिंबाच्या बागा वाचविण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले असून, कृषी खात्याच्या मदतीने द्राक्ष व डाळिंबबागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळGovernmentसरकार