शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हमीभावाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:08 IST

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेला हरताळ फासत संपूर्ण खरीप हंगामात भुसार मालाची खरेदी करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजी : केंद्राची हमीभाव योजना केवळ कागदावरच

नाशिक : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेला हरताळ फासत संपूर्ण खरीप हंगामात भुसार मालाची खरेदी करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. सर्वच बाजार समित्यांमध्ये उघडपणे ही खरेदी होत असताना एकाही बाजार समितीने त्यावर कारवाई तर दूरच; पण साधा आक्षेपही न नोंदविता हमीभाव हा केवळ कागदावरच असल्याचे दाखवून दिले असल्याचा आरोप केला जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात मका, सोयाबीन, बाजरी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या पिकांच्या उत्पादनावर आणि त्यांना मिळणाऱ्या दरावर अनेक शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन अवलंबून असते. केंद्र शासनाने या सर्वच पिकांना हमीभाव ठरवून दिला असला तरी संपूर्ण खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत सोयाबीन वगळता हमीभावाने शेतीमालाची खरेदी झाली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.

चौकट -

पीकनिहाय हमीभाव आणि बाजार समितीमधील सरासरी दर

पीक            हमीभाव             प्रचलित दर

मका १८५०             १२८१

बाजरी २१५०             ११८५

सोयाबीन ३८८०             ४१७०

कोट -

हार्वेस्टिंग झाल्यानंतर शेतकरी लगेचच माल विक्रीसाठी आणतात, तो माल हमीभावाच्या योग्यतेचा नसल्यामुळे व्यापारी कमी दराने हा माल खरेदी करतात. यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल वाळवून व प्रतवारी करून बाजारात आणायला हवा.

- विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

चौकट -

शासकीय खरेदी केंद्रांना होतो उशीर

केंद्र शासनातर्फे हमीभावाने शेतीमाल खरेदी केला जात असला तरी शासनाची ही खरेदी केंद्रे खूपच उशिराने सुरू होत असतात. शेतकऱ्यांना जेव्हा पैशांची गरज असते तोपर्यंत केंद्र सुरू होत नाही, पर्यायाने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात माल विक्री करावा लागतो. शासनाच्या खरेदी केंद्रांवर माल विक्रीसाठी मोठी प्रक्रिया असल्यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजारातच माल विक्री करणे पसंत करतात.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती