शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

  नाशिकरोड परिसरातील ग्रामीण भागात चोऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:12 IST

नाशिकरोड जवळील ग्रामीण गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, नाशिकरोड पोलिसांसमोर चोराच्या टोळ्यांचे मुसक्या आवळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड जवळील ग्रामीण गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, नाशिकरोड पोलिसांसमोर चोराच्या टोळ्यांचे मुसक्या आवळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखोरी, बाभळेश्वर, चेहेडी, सामनगावरोड या भागात गेल्या पंधरा दिवसांत तीन-चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. उकाड्यामुळे ग्रामस्थ घराबाहेर झोपले असल्याने चोरट्यांनी उघड्या दरवाजाचा किंवा दरवाजाची आतील कडी उघडून घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. ग्रामीण गावांमध्ये चोरट्यांनी आपले लक्ष्य केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. सामनगाव वृद्धाश्रमाजवळ राहाणारे तानाजी रुंजा ढोकणे यांचे कुटुंबाचे सदस्य गुरूवारी रात्री घरात, गच्चीवर व बाहेर ओट्यावर झोपी गेले होते. बाहेरून घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप-कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाखांचे २० तोळ्याचे दागिने चोरून नेले. ढोकणे यांच्या कुटुंबाच्या चोरी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उठल्यानंतर लक्षात आली.पोलिसांसमोर आव्हानग्रामीण भागात दाट लोकवस्ती बरोबर विखुरलेले व मळ्यत एकटी घरे आहेत. मात्र चोरटे परिसराची पूर्ण माहिती व रेकी करून चोरी यशस्वीपणे करत असल्याने चोरट्यांचा गावात दिवसा वावर असण्याची दाट शक्यता आहे. नदी पात्रातील वाळू काढण्यासाठी शेती व इतर कामासाठी बाहेरून मजूर, कामगार आले आहेत. तसेच पोलिसांची गस्त म्हणावी तशी पुरी पडत नसल्याने चोºयांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीर भागाला लक्ष्य करून चोºया करणाºया चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान नाशिकरोड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस