शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

उद्योगासोबत अर्थव्यवस्थाही व्हावी वृद्धिंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:08 IST

उत्पादन क्षेत्र आणि एकूणच उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प खूपच महत्त्वाचा असणार आहे. जीएसटीच्या व तत्पूर्वीच्या नोटाबंदीच्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर २०१८च्या अर्थसंकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. उद्योगांची वाढ व्हावी, महसुलात वाढ व्हावी तसेच देशाची अर्थव्यवस्थाही वाढावी, असे संतुलन यंदाच्या अर्थसंकल्पातून साधले जावे, अशी नाशिककरांची अपेक्षा असल्याने यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची कसोटी लागणार आहे.

नाशिक : उत्पादन क्षेत्र आणि एकूणच उद्योगांसाठी यंदाचा अर्थसंकल्प खूपच महत्त्वाचा असणार आहे. जीएसटीच्या व तत्पूर्वीच्या नोटाबंदीच्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर २०१८च्या अर्थसंकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. उद्योगांची वाढ व्हावी, महसुलात वाढ व्हावी तसेच देशाची अर्थव्यवस्थाही वाढावी, असे संतुलन यंदाच्या अर्थसंकल्पातून साधले जावे, अशी नाशिककरांची अपेक्षा असल्याने यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची कसोटी लागणार आहे.  गृहनिर्माण क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, जीएसटीचा दर कमी करावा, प्रकल्पांसाठी विविध परवानग्या मिळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी, पर्यावरणपूरक घरबांधणी करणाºया विकासकांना वाढीव एफएसआय देऊन प्रोत्साहन द्यावे, अशा अपेक्षा गृहनिर्माण क्षेत्राला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या अपेक्षा व्यक्त केल्या असून, महारेरा प्राधिकरणाची निर्मिती आणि वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी या दोन महत्त्वाच्या घडामोडी नव्या वर्षात घडल्या. रेरामुळे गृहनिर्माण क्षेत्राला शिस्त आली. या कायद्याविषयी गृहनिर्माण क्षेत्रात फार विरोध किंवा नाराजी उमटली नाही तर त्याचे स्वागतच झाले. तर जीएसटीमुळे मात्र मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट भार घर खरेदी करणाºया ग्राहकांवर पडला आहे. साहजिकच जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटी, असा दुहेरी आर्थिक भार पडल्याने ग्राहक आपले बजेट बघून सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जीएसटी कमी व्हावी, अशी या बांधकाम क्षेत्राची अपेक्षा आहे. जीएसटी कमी झाल्यास आर्थिक भार कमी होऊन घर खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर पुढे येतील, असा होरा आहे. गृहनिर्माण क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्यास उद्योगांना मिळणाºया सुविधा, सवलती, बँकांची कर्जे किंवा सरकारी अनुदान या क्षेत्राला मिळेल. त्यामुळे गुंतवणुकीसाठी भांडवल उपलब्ध होईल. परिणामी मोठ्या प्रमाणावर घरबांधणी होऊन घरांच्या किमतीही घटू शकतात. त्यामुळे उद्योगाचा दर्जा मिळण्याची मागणी होत आहे.महागाईला आळा घालावाउद्योग विशेषत: वाहन उत्पादन क्षेत्रातल्या धुरिणांनी पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक प्राधान्य देण्याची अपेक्षा असून, वित्तीय तूट ३.२ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महागाईला आळा घालण्याची व संतुलित आर्थिक वाढ साधण्याची अपेक्षा अर्थसंकल्पाकडून व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रिय योजनांपेक्षा, आर्थिक वाढीला अनुकूल उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.पायाभूत सुविधांवर भर द्यावा ‘मेक इन इंडिया’ या उद्देशाला पुढे न्यायचे असेल आणि भारतीय उद्योगांना सबल करायचे असेल तर सगळ्यात जास्त भर पायाभूत सुविधा व दळणवळणाच्या साधनांवर द्यावा लागेल. मोठे रस्ते, बंदरांचे आधुनिकीकरण तसेच रेल्वे व विमानतळांचे अत्याधुनिकीकरण या गोष्टी सरकारच्या अजेंडावर असण्याची गरज आहे आणि त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटायला हवे, अशी अपेक्षा आहे. तरच आपल्या देशाचा आगामी काळात झपाट्याने विकास होईल. अनेक विकासक सध्या ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित गृहप्रकल्पांची उभारणी करीत आहेत. पर्यावरणापुढे उभी राहिलेली आव्हाने लक्षात घेता ग्रीन बिल्डिंग संकल्पना भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करणारी ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकल्पांची उभारणी करणाºया विकासकांना प्रोत्साहन म्हणून अतिरिक्त एफएसआय किंवा अन्य सवलती द्याव्यात, पहिल्यांदा घर खरेदी करणाºया ग्राहकाला प्राप्तिकरात देण्यात आलेली सवलत आणखी वाढवावी, तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविध करांचे सुसूत्रिकरण करावे- निखिल रुंग्टा, संचालक, रुंग्टा ग्रुप

टॅग्स :Nashikनाशिक