शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कांदा भाव वाढण्याची उत्पादकांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

दरवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात राज्यात कांदा ५० टक्क्यांच्या पुढे शिल्लक आहे. सर्वसाधारण एप्रिल व मे महिन्यात ...

दरवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात राज्यात कांदा ५० टक्क्यांच्या पुढे शिल्लक आहे. सर्वसाधारण एप्रिल व मे महिन्यात दक्षिणेकडील राज्यात कांद्याला मागणी असते.

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांचे कामकाज गत महिन्यात सरासरी १० दिवस बंद राहिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला मागणी असल्याने पुरवठा सुरू राहिला. मात्र, आता व्यापाऱ्यांकडील संपुष्टात आलेला साठा व देशात मागणी वाढती असल्याने व्यापारी खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे दर स्थिर असल्याची स्थिती आहे. गत एप्रिल महिन्यात बाजारात होणाऱ्या लेट खरीप कांद्याची सध्या आवक मंदावली आहे, तर उन्हाळ कांद्याची आवक वाढती असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक व कांदा उपलब्धतेचा अंदाज असल्याने खरेदी करून कोटा पूर्ण करण्याची त्यांची लगबग आहे.

कांदा भाव व भुसार मालातही तेजी येईल अशी बाजार वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्या जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करण्याचा विचार लोकप्रतिनिधींकडून सुरु असल्याबद्दल शेतकरी बांधवांत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

रब्बी हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहे. पावसाळ्यात खते, बियाणे आदींसाठी शेतीभांडवल उभे करणे गरजेचे आहे. अशा वेळी कांदा व शेतीमालाच्या लिलावात येणारे पैसे उपयोगी पडतात. परंतु कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवल्यास पुढील हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होईल. परिणामी आधीच कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडू शकेल, असाही मतप्रवाह आहे. विविध कारणांनी बाजार समित्या सतत बंद असतात. त्याच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे गर्दी वाढते. उलट बाजार सतत चालू राहिल्याने गर्दी विभागली जाऊन संसर्गाचा धोका टळेल. त्यामुळे बाजार बंदचा निर्णय आत्मघातकी ठरून कोरोना संसर्गास निमंत्रण देणारा ठरेल, असे शेतकरी बांधवांना वाटत आहे.