शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाव वाढण्याची उत्पादकांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

दरवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात राज्यात कांदा ५० टक्क्यांच्या पुढे शिल्लक आहे. सर्वसाधारण एप्रिल व मे महिन्यात ...

दरवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात राज्यात कांदा ५० टक्क्यांच्या पुढे शिल्लक आहे. सर्वसाधारण एप्रिल व मे महिन्यात दक्षिणेकडील राज्यात कांद्याला मागणी असते.

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांचे कामकाज गत महिन्यात सरासरी १० दिवस बंद राहिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला मागणी असल्याने पुरवठा सुरू राहिला. मात्र, आता व्यापाऱ्यांकडील संपुष्टात आलेला साठा व देशात मागणी वाढती असल्याने व्यापारी खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे दर स्थिर असल्याची स्थिती आहे. गत एप्रिल महिन्यात बाजारात होणाऱ्या लेट खरीप कांद्याची सध्या आवक मंदावली आहे, तर उन्हाळ कांद्याची आवक वाढती असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक व कांदा उपलब्धतेचा अंदाज असल्याने खरेदी करून कोटा पूर्ण करण्याची त्यांची लगबग आहे.

कांदा भाव व भुसार मालातही तेजी येईल अशी बाजार वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्या जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करण्याचा विचार लोकप्रतिनिधींकडून सुरु असल्याबद्दल शेतकरी बांधवांत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

रब्बी हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहे. पावसाळ्यात खते, बियाणे आदींसाठी शेतीभांडवल उभे करणे गरजेचे आहे. अशा वेळी कांदा व शेतीमालाच्या लिलावात येणारे पैसे उपयोगी पडतात. परंतु कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवल्यास पुढील हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होईल. परिणामी आधीच कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडू शकेल, असाही मतप्रवाह आहे. विविध कारणांनी बाजार समित्या सतत बंद असतात. त्याच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे गर्दी वाढते. उलट बाजार सतत चालू राहिल्याने गर्दी विभागली जाऊन संसर्गाचा धोका टळेल. त्यामुळे बाजार बंदचा निर्णय आत्मघातकी ठरून कोरोना संसर्गास निमंत्रण देणारा ठरेल, असे शेतकरी बांधवांना वाटत आहे.