शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिमालयाचा प्रहरी गमावल्याची खंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:13 IST

ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने  जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. नाशिकला दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने ते येऊन गेल्याने त्यांच्या विचारांनीदेखील नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते. 

ठळक मुद्देअभिवादन : नाशिककरांनी जागवल्या बहुगुणा यांच्या स्मृती

नाशिक : ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने  जणू हिमालयाचा ‘प्रहरी’ अर्थात रक्षक गमावला असल्याची खंत नाशिकच्या जुन्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. नाशिकला दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने ते येऊन गेल्याने त्यांच्या विचारांनीदेखील नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते. बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाने ऐंशीच्या दशकात संपूर्ण देशातील पर्यावरणवाद्यांना बळ मिळाले होते. पर्यावरणाचे आंदोलन योग्य कारणासाठी असेल आणि तेदेखील आक्रमकतेने केले तर केंद्र आणि राज्यांचे शासनदेखील झुकू शकते, हे त्यांच्या आंदोलनांनी दाखवून दिले होते. नाशिकमध्ये कैलास मठात त्यांना १९९८ साली सरस्वती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच त्यानंतर २००४ या वर्षीदेखील त्यांचे नाशिकला एका कार्यक्रमानिमित्ताने आगमन झाल्याने त्यांचे विचार ऐकण्याची संधीदेखील लाभली होती. कैलास मठातील सरस्वती पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी प्रथम संबंध आला. त्यानंतर दर तीन-चार वर्षांनी ते नाशिकला आले किंवा मी हिमालयात गेलो की त्यांची भेट व्हायची. या धरतीशी आणि हिमालयाशी नातं असलेले ते एक महान व्यक्तिमत्त्व होते. आपल्या तत्त्वांशी अत्यंत प्रामाणिक असलेला मोठा सामाजिक कार्यकर्ता आणि मार्गदर्शक गमावल्याचे दु;ख आहे. - स्वामी संविदानंद सरस्वती, कैलास मठनाशिकला कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांची भेट झाली होती. आपला समाज उपभोगवादापासून दूर गेला नाही, तर निसर्गाचा विनाश अटळ असल्याचे त्यांचे शब्द अजूनही स्मरणात आहेत. प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या गरजा कमीत कमी करायला हव्यात, हा त्यांचा विचार आजही अनुकरणीय आहे. पर्यावरणासाठी झटणारा अत्यंत मोठा सामाजिक कार्यकर्ता गमावल्याचे दु:ख असून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. - दिगंबर गाडगीळ, ज्येष्ठ पक्षिमित्र

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक