शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी थांबली, वातावरण बदलाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:36 IST

अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.बेमोसमी पावसानंतर ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला. आता थंडीमुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी दिवसा उष्मा, तर रात्री काहीसे थंड वातावरण, याचा फटका द्राक्षांना बसला. ढगाळ वातावरणामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला होता. हे संक ट टाळण्यासाठी शेतकºयांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, आता नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षांना अपेक्षित भाव न मिळाल्यास शेतकºयांची आर्थिक कोंडी होईल.दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्याने, द्राक्षाच्या रंगावरही परिणाम होत आहे. तो अधिक वेळ टिकत नाही. द्राक्षांमध्ये साखर भरण्याची प्रक्रिया अत्यल्प गतीने होत आहे. मण्यांचा आकार वाढण्यासाठीही प्रतिकूल वातावरण असल्याने काढणी लांबण्याची शक्यता आहे.- मदन पिंगळे, संचालक, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक