शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी थांबली, वातावरण बदलाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:36 IST

अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.बेमोसमी पावसानंतर ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला. आता थंडीमुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी दिवसा उष्मा, तर रात्री काहीसे थंड वातावरण, याचा फटका द्राक्षांना बसला. ढगाळ वातावरणामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला होता. हे संक ट टाळण्यासाठी शेतकºयांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, आता नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षांना अपेक्षित भाव न मिळाल्यास शेतकºयांची आर्थिक कोंडी होईल.दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्याने, द्राक्षाच्या रंगावरही परिणाम होत आहे. तो अधिक वेळ टिकत नाही. द्राक्षांमध्ये साखर भरण्याची प्रक्रिया अत्यल्प गतीने होत आहे. मण्यांचा आकार वाढण्यासाठीही प्रतिकूल वातावरण असल्याने काढणी लांबण्याची शक्यता आहे.- मदन पिंगळे, संचालक, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक