शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

द्राक्षाला तडे...कांदा सडतोय, तर गहू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 19:03 IST

जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.

ठळक मुद्देसंकटाची मालिका अजूनही सुरूच

जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.                                                सध्या अनेक शेतकरी द्राक्ष बागेसाठी व्यापारी शोधत असून पंधरा ते वीस रुपये व्यापारी द्राक्षबागेला मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा भाव वाढतील या आशेने लावून धरल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बागेची बहुतेक कामे आटोपते आल्याने शेतकऱ्यांना आता पडत असलेल्या वादळी वारा, पाऊस व धुके पडत असलेल्या दवाने द्राक्षाच्या मण्यांना तडे जात आहे. अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

                      द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहे. या संकटावर मात करून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. गेली तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण व गुरुवारपासून वादळी वारे व पाऊस यामुळे अनेक द्राक्ष बागांना फटका बसला आहे. यामुळे द्राक्ष बागेला भरमसाठ खर्च करावा लागत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.काढणीला आलेला कांदा शेतातच सडलाद्राक्ष पाठोपाठ शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते पण कांदा पीकही करपा, मावा, तुडतुडेच्या विळख्यात सापडल्याने व काढणीला आलेला कांदा शेतातच सडत आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला शेतकरी औषधांवर औषधे फवारणी करुनही पाहिजे, असे उत्पादन लाल कांदा पिकातून निघत नसल्याने तसेच कांद्याला मिळत असलेला भाव हा शेतकरीवर्गाला खूश करत असला तरी शेतकरीही कांदा पिकावर भरमसाठ खर्च करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.मागील वर्षी कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने या वर्षीही द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटाची मालिका अजूनही सुरूच आहे. भरमसाठ खर्च होऊनही पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही वादळी वारा व पावसाने मारा केल्याने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मोठा खर्च होत असून संकटावर संकट येत आहे.- बाबासाहेब शिंदे, द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊर 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती