शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

द्राक्षाला तडे...कांदा सडतोय, तर गहू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 19:03 IST

जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.

ठळक मुद्देसंकटाची मालिका अजूनही सुरूच

जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.                                                सध्या अनेक शेतकरी द्राक्ष बागेसाठी व्यापारी शोधत असून पंधरा ते वीस रुपये व्यापारी द्राक्षबागेला मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा भाव वाढतील या आशेने लावून धरल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बागेची बहुतेक कामे आटोपते आल्याने शेतकऱ्यांना आता पडत असलेल्या वादळी वारा, पाऊस व धुके पडत असलेल्या दवाने द्राक्षाच्या मण्यांना तडे जात आहे. अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

                      द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहे. या संकटावर मात करून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. गेली तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण व गुरुवारपासून वादळी वारे व पाऊस यामुळे अनेक द्राक्ष बागांना फटका बसला आहे. यामुळे द्राक्ष बागेला भरमसाठ खर्च करावा लागत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.काढणीला आलेला कांदा शेतातच सडलाद्राक्ष पाठोपाठ शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते पण कांदा पीकही करपा, मावा, तुडतुडेच्या विळख्यात सापडल्याने व काढणीला आलेला कांदा शेतातच सडत आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला शेतकरी औषधांवर औषधे फवारणी करुनही पाहिजे, असे उत्पादन लाल कांदा पिकातून निघत नसल्याने तसेच कांद्याला मिळत असलेला भाव हा शेतकरीवर्गाला खूश करत असला तरी शेतकरीही कांदा पिकावर भरमसाठ खर्च करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.मागील वर्षी कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने या वर्षीही द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटाची मालिका अजूनही सुरूच आहे. भरमसाठ खर्च होऊनही पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही वादळी वारा व पावसाने मारा केल्याने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मोठा खर्च होत असून संकटावर संकट येत आहे.- बाबासाहेब शिंदे, द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊर 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती