शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:53 PM

पाटोदा - अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाटोदा ( गोरख घुसळे ):- अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केलेला खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्ष हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील अर्थकारणाची पूर्ण गतीच मंदावली आहे.संकटे , शेतकरी आणि शेती हे समीकरण सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ हवामान धुके, दव यामुळे द्राक्षबागा रोगाच्या बळी ठरल्या आहे.अशाही परिस्थितीत शेतकºयांनी औषध फवारणी करून बागा जागविल्या मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याची थंडी व बागांवर साचणारे दविबंदू द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने सध्या काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष बागा खरेदीसाठीही व्यापारी धजावत नाही जरी व्यापारी खरेदी साठी आला तरी अत्यल्प दराने मागणी होत असल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली असून तो पूर्णता मेटाकुटीला आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सतत दुष्काळाशी दोन हात करणाºया येवला तालुक्यात या वर्षी वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने मोठया आनंदाने उधार उसनवार तसेच कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका तसेच सावकाराकडे गहाण ठेवून खरीप हंगामाची पेरणी तसेच द्राक्ष बागांची तयारी केली .काही दिवसात पिके चांगली आली मात्र आॅक्टोबर व नोव्हेंबर मिहन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या आनंदावर विरजण पडले हातातोंडाशी आलेली सर्व पिके खराब झाली.या अवकाळी पावसाने सप्टेंबर ,आॅक्टोबर मिहन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्ष बागा वाया गेल्या आहे .ज्या थोडयाफार बागा अवकाळीच्या तडाख्यातून वाचल्या आहे आशा बागांनाही उत्पन्नाचा मोठा फटका बसला असल्याने अवस्था बिकट झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी एकरी सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त खर्च केलेला असून एकरी सरासरी वीस टन उत्पन्न निघणे अपेक्षित होते मात्र या अवकाळी पावसामुळे फक्त पाच ते सात टन इतके अत्यल्प उत्पन्न निघत असून सरासरी बाजारभाव पंचवीस ते पन्नास रु पये दरम्यान मिळत असल्याने शेतकर्यांनी केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात कर्ज बाजरी झाला असून घेतलेले कर्ज व औषध दुकानदारांची देनेदारी कशी फेडायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक