शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसाच्या धास्तीने द्राक्ष उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:18 IST

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.परिसरात मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच विविध प्रकारच्या रोगांच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग सातत्याने रब्बी हंगामातील पिकांवर औषध फवारणी करत असून त्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे.वातावरणातील या बदलामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला असून द्राक्ष व कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून कधीमधी रात्रीच्या वेळी सुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे आढळून आले आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्याला यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असताना, कांदा लागवडीसाठी रोपांची वानवा आहे. यंदा कांद्याचे दर हे तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्व सामान्य शेतकºयांना आवाक्या बाहेर झाले आहे.इन्फो...कांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला देखील सोन्याचा भाव मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरी वर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याच्या बियाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून एव्हढ्या महागड्या दराने बी घेऊन कांदा लागबडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना धास्ती केवळ अवकाळी पावसाची लागली आहे.चौकट....द्राक्षे बागेला द्राक्षे फळ लागले असून ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने अवकाळी पावसातून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च हा वाया जाणार असून शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खायीत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके,द्राक्ष उत्पादक शेतकरी, मानोरी.(फोटो २६ मानोरी ५)मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्याने झाकून ठेवलेल्या मक्याचा गंज.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस