शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या धास्तीने द्राक्ष उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:18 IST

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.परिसरात मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच विविध प्रकारच्या रोगांच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग सातत्याने रब्बी हंगामातील पिकांवर औषध फवारणी करत असून त्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे.वातावरणातील या बदलामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला असून द्राक्ष व कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून कधीमधी रात्रीच्या वेळी सुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे आढळून आले आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्याला यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असताना, कांदा लागवडीसाठी रोपांची वानवा आहे. यंदा कांद्याचे दर हे तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्व सामान्य शेतकºयांना आवाक्या बाहेर झाले आहे.इन्फो...कांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला देखील सोन्याचा भाव मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरी वर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याच्या बियाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून एव्हढ्या महागड्या दराने बी घेऊन कांदा लागबडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना धास्ती केवळ अवकाळी पावसाची लागली आहे.चौकट....द्राक्षे बागेला द्राक्षे फळ लागले असून ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने अवकाळी पावसातून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च हा वाया जाणार असून शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खायीत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके,द्राक्ष उत्पादक शेतकरी, मानोरी.(फोटो २६ मानोरी ५)मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्याने झाकून ठेवलेल्या मक्याचा गंज.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस