शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

पावसाच्या धास्तीने द्राक्ष उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:18 IST

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.परिसरात मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच विविध प्रकारच्या रोगांच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग सातत्याने रब्बी हंगामातील पिकांवर औषध फवारणी करत असून त्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे.वातावरणातील या बदलामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला असून द्राक्ष व कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून कधीमधी रात्रीच्या वेळी सुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे आढळून आले आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्याला यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असताना, कांदा लागवडीसाठी रोपांची वानवा आहे. यंदा कांद्याचे दर हे तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्व सामान्य शेतकºयांना आवाक्या बाहेर झाले आहे.इन्फो...कांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला देखील सोन्याचा भाव मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरी वर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याच्या बियाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून एव्हढ्या महागड्या दराने बी घेऊन कांदा लागबडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना धास्ती केवळ अवकाळी पावसाची लागली आहे.चौकट....द्राक्षे बागेला द्राक्षे फळ लागले असून ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने अवकाळी पावसातून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च हा वाया जाणार असून शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खायीत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके,द्राक्ष उत्पादक शेतकरी, मानोरी.(फोटो २६ मानोरी ५)मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्याने झाकून ठेवलेल्या मक्याचा गंज.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस