शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पावसाच्या धास्तीने द्राक्ष उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:18 IST

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन, कधी थंडी, कधी ढगाळ हवामान तर मधेच अवकाळी पाऊस ..... वातावरणातील या बदलामुळे सर्व सामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असल्याचे तो पुन्हा एकदा धास्तावला आहे.परिसरात मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अचानक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच विविध प्रकारच्या रोगांच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग सातत्याने रब्बी हंगामातील पिकांवर औषध फवारणी करत असून त्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे.वातावरणातील या बदलामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला असून द्राक्ष व कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून कधीमधी रात्रीच्या वेळी सुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड आळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे आढळून आले आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्याला यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असताना, कांदा लागवडीसाठी रोपांची वानवा आहे. यंदा कांद्याचे दर हे तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्व सामान्य शेतकºयांना आवाक्या बाहेर झाले आहे.इन्फो...कांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला देखील सोन्याचा भाव मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरी वर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे अशा ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. कांद्याच्या बियाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून एव्हढ्या महागड्या दराने बी घेऊन कांदा लागबडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना धास्ती केवळ अवकाळी पावसाची लागली आहे.चौकट....द्राक्षे बागेला द्राक्षे फळ लागले असून ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने अवकाळी पावसातून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च हा वाया जाणार असून शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खायीत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके,द्राक्ष उत्पादक शेतकरी, मानोरी.(फोटो २६ मानोरी ५)मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्याने झाकून ठेवलेल्या मक्याचा गंज.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस