शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कुंदलगावी शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड, अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 16:39 IST

मनमाड : मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथे साेमवारी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हातात आलेले द्राक्ष पीक सडून गेल्याने ...

मनमाड : मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथे साेमवारी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हातात आलेले द्राक्ष पीक सडून गेल्याने शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग नष्ट केली. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णासारखी द्राक्षाची स्थिती झाल्याने शेतकऱ्याने द्राक्ष पिकावर कुऱ्हाडीचे घाव घातले आहेत. खरीप हंगामाबरोबरच द्राक्ष पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहाटेचे धुके, दुपारचे ऊन आणि सायंकाळचा पाऊस आणि वाढलेली थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष पीक जगवणे मुश्कील झाल्याने द्राक्ष बागायतदार टोकाचे पाऊल उचलत आहेत. बागा वाचविण्यासाठी एकरी वार्षिक १ लाख ५० हजार रुपयांची औषध फवारणी करून देखील हाती काही येईल, याची खात्री उरलेली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या मनमाड शहरापासून जवळच असलेल्या कुंदलगाव ता. चांदवड येथील शंकर कारभारी गांगुर्डे कुंभार या शेतकऱ्याने दोन एकर थामसन जातीच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून बाग तोडून टाकली.

२२ गावांना तडाखा

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील २२ गावांमधील १८७२ शेतकऱ्यांचे ७० हेक्टरवरील कांदा, मका या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पीक मातीमोल झाले असून त्यात कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दव, धुके आणि रिमझिम पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

लाखो रुपयांची गुंतवणूक करून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण आणि वाढती थंडीमुळे द्राक्ष बाग टिकवणे हालाखीचे झाले असून सलग तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्याने संतापून द्राक्ष बागेवर कुऱ्हाडीचे घाव घालण्याची वेळ आली आहे.

- शंकर कारभारी गांगुर्डे, शेतकरी

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी