शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

कुंदलगावी शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड, अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 16:39 IST

मनमाड : मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथे साेमवारी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हातात आलेले द्राक्ष पीक सडून गेल्याने ...

मनमाड : मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथे साेमवारी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हातात आलेले द्राक्ष पीक सडून गेल्याने शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग नष्ट केली. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णासारखी द्राक्षाची स्थिती झाल्याने शेतकऱ्याने द्राक्ष पिकावर कुऱ्हाडीचे घाव घातले आहेत. खरीप हंगामाबरोबरच द्राक्ष पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहाटेचे धुके, दुपारचे ऊन आणि सायंकाळचा पाऊस आणि वाढलेली थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष पीक जगवणे मुश्कील झाल्याने द्राक्ष बागायतदार टोकाचे पाऊल उचलत आहेत. बागा वाचविण्यासाठी एकरी वार्षिक १ लाख ५० हजार रुपयांची औषध फवारणी करून देखील हाती काही येईल, याची खात्री उरलेली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या मनमाड शहरापासून जवळच असलेल्या कुंदलगाव ता. चांदवड येथील शंकर कारभारी गांगुर्डे कुंभार या शेतकऱ्याने दोन एकर थामसन जातीच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून बाग तोडून टाकली.

२२ गावांना तडाखा

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील २२ गावांमधील १८७२ शेतकऱ्यांचे ७० हेक्टरवरील कांदा, मका या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पीक मातीमोल झाले असून त्यात कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दव, धुके आणि रिमझिम पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

लाखो रुपयांची गुंतवणूक करून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण आणि वाढती थंडीमुळे द्राक्ष बाग टिकवणे हालाखीचे झाले असून सलग तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्याने संतापून द्राक्ष बागेवर कुऱ्हाडीचे घाव घालण्याची वेळ आली आहे.

- शंकर कारभारी गांगुर्डे, शेतकरी

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी