शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:32 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीने जोर धरल्याने पारा १० अंशावर पोहोचला आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी वाढत्या थंडीने द्राक्ष मन्यांना तडे, भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.

सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीने जोर धरल्याने पारा १० अंशावर पोहोचला आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी वाढत्या थंडीने द्राक्ष मन्यांना तडे, भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. अनेक काळी द्राक्ष देण्यासाठी तयार झाली असली तरी तर सतत बदलत असलेल्या हवामानामुळे पीक शेवटच्या टप्प्यात धोक्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी ओखा वादळाचा तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतांनाच दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. थंडीसोबत कधी ढगाळ तर कधी वारा असा वतावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष बागांवर भुरी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शिवाय मणी फुगवण थांबली आहे. जे प्लॉट देण्यासाठी आले आहे. त्यांना वाढत्या थंडीने तडे जात असल्याने शेतकºयांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून नेतोय का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा, पालेभाज्या,फळभाज्या यांच्यावर मवा ,अळी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकांची वाढ होत नाही, शेतात उभे पीक करपा रोगामुळे वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी कसरतीमुळे लाखो रु पये खर्च वाढत असूनही बाग वाचविणे जिकरीचे झाले आहे

टॅग्स :Nashikनाशिक