शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 01:22 IST

नाशिक : कोणत्याही संस्थेच्या विकासात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा अधिकारी, कर्मचाºयांमुळेच सर्वसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहचली जात असल्याने शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेले ग्रामसेवक म्हणूनच जिल्हा परिषदेच्या विकासाचा कणा आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाघचौरे, सचिव रवींद्र शेलार आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देशीतल सांगळे : ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक : कोणत्याही संस्थेच्या विकासात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. अशा अधिकारी, कर्मचाºयांमुळेच सर्वसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहचली जात असल्याने शासन आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेले ग्रामसेवक म्हणूनच जिल्हा परिषदेच्या विकासाचा कणा आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर सभापती मनीषा पवार, यतिंद्र पगार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प संचालक अरविंद मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाघचौरे, सचिव रवींद्र शेलार आदी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीतानंतर मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी सांगळे म्हणाल्या, नाशिक जिल्हा परिषदेच्या विकासात कर्मचाºयांचा आणि ग्रामसेवकांचा मोठा वाटा आहे. अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्हा परिषदेला दिल्लीत पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामसेवकांना मोठे अधिकार असल्याने त्यांनी ठरविले तर प्रत्येक गाव हे आदर्श होऊ शकते, असे सांगळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला आपल्या कार्यकाळात चांगले काम व्हावे, असे वाटत असते. ग्रामसेवकांच्या सहकार्यामुळे विद्यमान सदस्यांच्या काळात अनेक चांगली कामे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते म्हणाले, ग्रामसेवक हा त्या गावाचा मुख्य कार्यकारी अधिकारीच असतो. ग्रामसेवकांनी आपल्या क्षमता ओळखून कामकाज केले तर सकारात्मक चित्र उभे राहू शकते. अनेक ग्रामसेवकांनी हे सिद्धदेखील केले आहे. काही अपवाद नक्कीच आहेत त्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा, कुपोषण, स्वच्छता याबाबतीत चांगले काम केले आहे. ग्रामसेवकांच्या सकारात्मक मानसिकतेशिवाय हे शक्य नव्हते, असे गिते म्हणाले. डीपीडीसी, एमआरजीएसच्या माध्यमातून कामांचे नियोजन आणि पूर्णत्वास नेण्याचे कौशल्य ग्रामसेवकांनी दाखवावे, असे आवाहन गिते यांनी यावेळी केले. याप्रसंगी सभापती यतिंद्र पगार, मनीषा पवार, आत्माराम कुंभार्डे यांची भाषणे झाली.

पुरस्कार विजेते : (सन २०१५-१६)

१) वसंत पंडित जाधव (विस्तार अधिकारी, बागलाण), २) रवींद्र परशराम देवरे (यशवंतनगर), ३) संगीता दादाजी बच्छाव (नन्हावे), ४) नंदू निंबा सोनवणे (विठेवाडी), ५) निर्मला रामू खांडवी (दिंडोरी), ६) जगदीशकुमार जिजाबराव कदम (नांदूरवैद्य), ७) श्रीमती जिजाबाई सोनीराम चौधरी (आठंबे), ८) बापू दत्तू कदम (मांजरे), ९) विरूनाथ सुरेश गेंद (गंगाधरी), १०) पांडुरंग झुलाल ठोके (सय्यद पिंप्री), ११) कैलास बाबुराव बेंडके (खडक माळेगाव), १२) सचिन यमाजी नेहते (हनुमंतपाड), १३) वसंत अर्जुन भोये (गौदुणे), १४) दीपक सुभाष भोसले. १५) जितेंद्र भाईदास नांद्रे (अंबोली), १६) देवचंद बाबाजी श्ािंदे (एरंडगाव).

पुरस्कार विजेते : (सन २०१६-१७)

१) संजय धर्मा महाले (विस्तार अधिकारी ) कळवण, २) पंकज भगवान पवार (बागलाण, जोरण), ३) रोशन बळवंत सूर्यवंशी (हट्टी, चांदवड), ४) जयश्री बाळासाहेब अहेर (काचणे), ५) विनोद सुधाकर अहिरे (अवनखेड, दिंडोरी), ६) प्रीती यशवंत बुरकुल (उंबरकोण, इगतपुरी), ७) वैभव राजाराम गांगुर्डे (पाळे खुर्द, कळवण), ८) देवेंद्र कृष्णाजी हिरे (जेऊर, मालेगाव), ९) अतुल बाळासाहेब सोनवणे (क्रांतीनगर, नांदगाव), १०) माधवी सुभाष मोरे (दहेगाव, नाशिक), ११) सुनील मधुकर शिंदे (शिवरे, निफाड), १२) दुर्गादास देवराम बोसारे (आडगाव भु, पेठ), १३) विकास नीलकंठ अहिरराव (माळेगाव, सुरगाणा), १४) माधुरी हरी सानप (धोंडबार, सिन्नर), १५) श्यामकांत पंडितराव बोरसे (शिरसगाव, त्र्यंबकेश्वर), १६) योगीता दादासाहेब मतसागर (कुसुमाडी, येवला)