शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 10:19 PM

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा खंडीत केल्याने गाव 8 दिवसापासून अंधारात

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, महावितरणने सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. महावितरणने थकबाकी भरल्यानंतर ग्रामपंचायत लगेच थकबाकी भरण्यास तयार असल्यामुळे त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. महावितरणनेदेखील ग्रामपंचायतीची सहा लाख रुपये थकबाकी द्यावी; नाही तर वीज उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी दिला आहे.ओतूर ग्रामपंचायतीचे वीज बिल नऊ लाख रुपये थकल्याने महावितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली गणेशोत्सवाच्या कालावधीत पथदिपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गाव अंधारात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव महावितरणमुळे ग्रामस्थांना अंधारात साजरा करावा लागला. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असून चालू महिन्याचे वीज बिल आठ हजार २०० रोख भरणा करून महावितरणने गावाला सहकार्य केल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे.मात्र पथदीप बंद असल्याने गावात रात्रभर अंधार असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. शेतात जाणेही कठीण झाले आहे. संपूर्ण रात्र गावात अंधार असल्याने गावात स्मशानशांतता पसरते. गावातील भटक्या कुत्र्यांची व सध्या पावसाळा असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याची भीती वाढली आहे.अंधाराचा फायदा घेत चोरटेही सक्रिय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण ओळखून महावितरण कंपनीने तत्काळ ग्रामपंचायतीचा पथदीप वीजपुरवठा सुरळीत करून गावातील अंधार घालवावा, अशी मागणी सरपंच पार्वता गांगुर्डे, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे नियमित वीज बिल भरले आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे महावितरणची नऊ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीची सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये थकबाकी आहे. याबाबत नियमित पत्रव्यवहार केला आहे. थकबाकी मिळाल्यानंतर वीज बिल बाकीत भरणा केला जाईल.पार्वता गांगुर्डे, सरपंच, ओतूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज