शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:04 IST

एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल धान्याची दरमहा बचत होत आहे.पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरासाठी दरमहा २९,११२ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर असून, त्यापैकी ११,२५५ मेट्रिक टन धान्याची दुकानदारांकडून उचल झाली आहे. जिल्ह्णात एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या सहाय्याने रेशनमधून धान्य वितरण केले जात असून, त्यांचे आधार क्रमांकही जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे पॉस यंत्रातील माहितीशी लाभार्थ्यांची होणारी ओळख व आधारमुळे बोटाचे ठसे जुळत असल्याने रेशनमधून खºया लाभार्थ्यांनाच धान्य मिळू लागले आहे. परिणामी यापूर्वी होणाºया धान्याच्या उचलमध्ये कमालीची तफावत निर्माण झाल्याचे पाहून मोठ्या प्रमाणावर बनावट शिधापत्रिका असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यातूनच धान्य शिल्लक राहात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्णासाठी दोन लाख १५ हजार ८ क्विंटल नियतन मंजूर असले तरी, आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात जवळपास ४० टक्क्याहून कमीच धान्याची उचल करण्यात आली. साधारणत: जिल्ह्णाला मंजूर होणाºया एकूण धान्याच्या नियतनातून दरमहा २० टक्के धान्य शिल्लक राहात असून, त्याचे प्रमाण पाहता ४० हजार क्विंटल धान्य नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा दावा पुरवठा अधिकारी अर्जुन यांनी केला आहे.दीड लाख लाभार्थी निवडणारजिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्य शिल्लक राहात असल्याने ते नवीन शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून तहसील पातळीवर लाभार्थी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही लाभार्थी पुढे आलेले नाहीत. शिल्लक राहणारे धान्य सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारकांना वाटप होऊ शकते, असा अंदाज असल्याने येणाºया काळात लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक