शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांनंतर अतिवृष्टीबाधितांवर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होेते. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात येऊनही दिवाळीनंतर केवळ दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळू शकली. त्यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

राज्याला बसलेला अतिवृष्टीचा फटका त्यातच कोरेानाचे संकट यामुळे मदतीला विलंब होणार असला तरी शासनाकडून यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला. दिवाळी तोंडावर आल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शेतकऱ्यांना दिवाळीतही गोड बातमी मिळाली नाही. दिवाळीनंतर का होईना जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांसाठी ११० कोटी प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमाही करण्यात आली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नूकसान झाले असताना केवळ निम्म्याच शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हफ्ता मिळाल्याने उर्वरित २ लाख ४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी रक्कम जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर चार महिन्यांनंतर का होईना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १११ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला. चार महिन्यांनंतर उर्वरित शेतकऱ्यांवर कृपादृष्टी बरसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन, कांदा, मका तसेच ज्वारीच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतातील उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. शेतमालाबरोबरच भाजीबाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे मदत नेमकी कधी मिळेल याविषयीची शंका उपस्थित झाली होती. मदतीची मागणी होऊ लागल्याने शासनाने दिवाळीत शेतरकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळीदेखील टळून गेल्याने चिंता वाढली होती.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी २४२ कोटींची मदत शासनाकडे मागितली होती. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत देण्यात आली. त्याचा लाभ एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांना झाला. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील डिसेंबरच्या आत मदत दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र डिसेंबर उलटून गेल्यानंतरही मदतीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चिंता वाढली होती. अखेर जानेवारीच्या उत्तरार्धात शासनाची कृपादृष्टी बरसली आणि अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.