शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

चार महिन्यांनंतर अतिवृष्टीबाधितांवर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होेते. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात येऊनही दिवाळीनंतर केवळ दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळू शकली. त्यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

राज्याला बसलेला अतिवृष्टीचा फटका त्यातच कोरेानाचे संकट यामुळे मदतीला विलंब होणार असला तरी शासनाकडून यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला. दिवाळी तोंडावर आल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शेतकऱ्यांना दिवाळीतही गोड बातमी मिळाली नाही. दिवाळीनंतर का होईना जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांसाठी ११० कोटी प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमाही करण्यात आली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नूकसान झाले असताना केवळ निम्म्याच शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हफ्ता मिळाल्याने उर्वरित २ लाख ४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी रक्कम जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर चार महिन्यांनंतर का होईना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १११ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला. चार महिन्यांनंतर उर्वरित शेतकऱ्यांवर कृपादृष्टी बरसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन, कांदा, मका तसेच ज्वारीच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतातील उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. शेतमालाबरोबरच भाजीबाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे मदत नेमकी कधी मिळेल याविषयीची शंका उपस्थित झाली होती. मदतीची मागणी होऊ लागल्याने शासनाने दिवाळीत शेतरकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळीदेखील टळून गेल्याने चिंता वाढली होती.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी २४२ कोटींची मदत शासनाकडे मागितली होती. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत देण्यात आली. त्याचा लाभ एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांना झाला. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील डिसेंबरच्या आत मदत दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र डिसेंबर उलटून गेल्यानंतरही मदतीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चिंता वाढली होती. अखेर जानेवारीच्या उत्तरार्धात शासनाची कृपादृष्टी बरसली आणि अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.