शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चार महिन्यांनंतर अतिवृष्टीबाधितांवर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होेते. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात येऊनही दिवाळीनंतर केवळ दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळू शकली. त्यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

राज्याला बसलेला अतिवृष्टीचा फटका त्यातच कोरेानाचे संकट यामुळे मदतीला विलंब होणार असला तरी शासनाकडून यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला. दिवाळी तोंडावर आल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शेतकऱ्यांना दिवाळीतही गोड बातमी मिळाली नाही. दिवाळीनंतर का होईना जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांसाठी ११० कोटी प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमाही करण्यात आली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नूकसान झाले असताना केवळ निम्म्याच शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हफ्ता मिळाल्याने उर्वरित २ लाख ४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी रक्कम जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर चार महिन्यांनंतर का होईना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १११ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला. चार महिन्यांनंतर उर्वरित शेतकऱ्यांवर कृपादृष्टी बरसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन, कांदा, मका तसेच ज्वारीच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतातील उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. शेतमालाबरोबरच भाजीबाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे मदत नेमकी कधी मिळेल याविषयीची शंका उपस्थित झाली होती. मदतीची मागणी होऊ लागल्याने शासनाने दिवाळीत शेतरकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळीदेखील टळून गेल्याने चिंता वाढली होती.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी २४२ कोटींची मदत शासनाकडे मागितली होती. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत देण्यात आली. त्याचा लाभ एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांना झाला. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील डिसेंबरच्या आत मदत दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र डिसेंबर उलटून गेल्यानंतरही मदतीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चिंता वाढली होती. अखेर जानेवारीच्या उत्तरार्धात शासनाची कृपादृष्टी बरसली आणि अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.