शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

चार महिन्यांनंतर अतिवृष्टीबाधितांवर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...

नाशिक : गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होेते. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात येऊनही दिवाळीनंतर केवळ दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळू शकली. त्यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला.

राज्याला बसलेला अतिवृष्टीचा फटका त्यातच कोरेानाचे संकट यामुळे मदतीला विलंब होणार असला तरी शासनाकडून यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला. दिवाळी तोंडावर आल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शेतकऱ्यांना दिवाळीतही गोड बातमी मिळाली नाही. दिवाळीनंतर का होईना जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांसाठी ११० कोटी प्राप्त झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमाही करण्यात आली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नूकसान झाले असताना केवळ निम्म्याच शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हफ्ता मिळाल्याने उर्वरित २ लाख ४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी रक्कम जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर चार महिन्यांनंतर का होईना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १११ कोटींचा दुसरा हप्ता देण्यात आला. चार महिन्यांनंतर उर्वरित शेतकऱ्यांवर कृपादृष्टी बरसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन, कांदा, मका तसेच ज्वारीच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतातील उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. शेतमालाबरोबरच भाजीबाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे राज्यातील आर्थिक स्थिती डगमगल्यामुळे मदत नेमकी कधी मिळेल याविषयीची शंका उपस्थित झाली होती. मदतीची मागणी होऊ लागल्याने शासनाने दिवाळीत शेतरकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे जाहीर केले होते. परंतु दिवाळीदेखील टळून गेल्याने चिंता वाढली होती.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी २४२ कोटींची मदत शासनाकडे मागितली होती. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत देण्यात आली. त्याचा लाभ एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांना झाला. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील डिसेंबरच्या आत मदत दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र डिसेंबर उलटून गेल्यानंतरही मदतीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चिंता वाढली होती. अखेर जानेवारीच्या उत्तरार्धात शासनाची कृपादृष्टी बरसली आणि अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.