शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्टिकल फार्मिंगची अत्याधुनिकता पाहून राज्यपाल कोश्यारी प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 01:39 IST

इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन विविध जातींच्या वाणांची पाहणी रविवारी (दि.३०) केली. या प्रकल्पात प्रामुख्याने सेंद्रिय हळद व मत्स्य शेतीबरोबरच एकूण ९७ पिके घेतली जातात. कोश्यारी यांनी प्रकल्पातील आधुनिक यंत्र साहित्यांची पाहणी केल्यानंतर सेंद्रिय शेती व आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देघोटी : सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल

नाशिक : इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन विविध जातींच्या वाणांची पाहणी रविवारी (दि.३०) केली. या प्रकल्पात प्रामुख्याने सेंद्रिय हळद व मत्स्य शेतीबरोबरच एकूण ९७ पिके घेतली जातात. कोश्यारी यांनी प्रकल्पातील आधुनिक यंत्र साहित्यांची पाहणी केल्यानंतर सेंद्रिय शेती व आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन केले. राज्यपाल कोश्यारी यांनी तब्बल दोन तास या प्रकल्पाच्या विविध घटकांची पाहणी केली. प्रारंभी प्रकल्पाचे प्रमुख संस्थापक संचालक प्रशांत झाडे व शिरीष पारकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. देशात २० राज्यांत जवळपास १४००च्यावर असे प्रकल्प स्थापित होत असून, त्यात २८१ प्रकल्प राज्यात कार्यान्वित झाले आहेत. त्यामधून उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. यामध्ये २०० पॉलिहाऊसचे काम सुरू आहे. या प्रकल्पात आठ हजार ६०० गुंतवणूकदार असून, घोटी येथील प्रकल्पात साडेसात एकरात जवळपास ९७ पिके घेतली जात आहेत. त्यात १७ वेलवर्गीय, तर ८० पिके जमिनीतून घेतली जाणारी आहेत. या प्रकल्पात सेंद्रिय हळद मुख्य उत्पादन असून, तुलनेत १०० एकरामध्ये निघणारे उत्पादन हे या प्रकल्पात एका एकरामध्ये काढले जात आहे.

इन्फो

मत्स्य शेतीचाही प्रयोग

एएस ॲग्री ॲण्ड ॲक्वा कंपनीच्या या प्रोजेक्टमध्ये ३६ प्रकारच्या वाणाचे संशोधन झाले असून, त्यात तेलवर्गीय व दाळवर्गीय उत्पादन घेतले जात आहे. याच धर्तीवर मत्स्य शेती उत्पादन केली जात आहे. ६ फूट लांब आणि २ फूट रुंदीच्या आकाराच्या ३६ टँकमधून मत्स्य शेती केली जात आहे. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली. वेळ व पाण्याची बचत करून सेंद्रिय उत्पन्न घेणाऱ्या या सर्व प्रोजेक्टची पाहणी करताना कोश्यारी यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी प्रकल्प संस्थापक संचालक प्रशांत झाडे, कमलेश ओझे, संदीप सामंत, प्रवीण पठारे, हर्षल ओझे, वैभव कोतलापुरे, संदेश खामकर, सुरिंदर धीमन, निरंजन कडले, जयंत बांदेकर, साईनाथ हाडोळे, रोहित लोणकर, हिरेन पटेल, नवनीत तुली आदी संचालक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी