शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

व्हर्टिकल फार्मिंगची अत्याधुनिकता पाहून राज्यपाल कोश्यारी प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 01:39 IST

इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन विविध जातींच्या वाणांची पाहणी रविवारी (दि.३०) केली. या प्रकल्पात प्रामुख्याने सेंद्रिय हळद व मत्स्य शेतीबरोबरच एकूण ९७ पिके घेतली जातात. कोश्यारी यांनी प्रकल्पातील आधुनिक यंत्र साहित्यांची पाहणी केल्यानंतर सेंद्रिय शेती व आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देघोटी : सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल

नाशिक : इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन विविध जातींच्या वाणांची पाहणी रविवारी (दि.३०) केली. या प्रकल्पात प्रामुख्याने सेंद्रिय हळद व मत्स्य शेतीबरोबरच एकूण ९७ पिके घेतली जातात. कोश्यारी यांनी प्रकल्पातील आधुनिक यंत्र साहित्यांची पाहणी केल्यानंतर सेंद्रिय शेती व आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन केले. राज्यपाल कोश्यारी यांनी तब्बल दोन तास या प्रकल्पाच्या विविध घटकांची पाहणी केली. प्रारंभी प्रकल्पाचे प्रमुख संस्थापक संचालक प्रशांत झाडे व शिरीष पारकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. देशात २० राज्यांत जवळपास १४००च्यावर असे प्रकल्प स्थापित होत असून, त्यात २८१ प्रकल्प राज्यात कार्यान्वित झाले आहेत. त्यामधून उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. यामध्ये २०० पॉलिहाऊसचे काम सुरू आहे. या प्रकल्पात आठ हजार ६०० गुंतवणूकदार असून, घोटी येथील प्रकल्पात साडेसात एकरात जवळपास ९७ पिके घेतली जात आहेत. त्यात १७ वेलवर्गीय, तर ८० पिके जमिनीतून घेतली जाणारी आहेत. या प्रकल्पात सेंद्रिय हळद मुख्य उत्पादन असून, तुलनेत १०० एकरामध्ये निघणारे उत्पादन हे या प्रकल्पात एका एकरामध्ये काढले जात आहे.

इन्फो

मत्स्य शेतीचाही प्रयोग

एएस ॲग्री ॲण्ड ॲक्वा कंपनीच्या या प्रोजेक्टमध्ये ३६ प्रकारच्या वाणाचे संशोधन झाले असून, त्यात तेलवर्गीय व दाळवर्गीय उत्पादन घेतले जात आहे. याच धर्तीवर मत्स्य शेती उत्पादन केली जात आहे. ६ फूट लांब आणि २ फूट रुंदीच्या आकाराच्या ३६ टँकमधून मत्स्य शेती केली जात आहे. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली. वेळ व पाण्याची बचत करून सेंद्रिय उत्पन्न घेणाऱ्या या सर्व प्रोजेक्टची पाहणी करताना कोश्यारी यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी प्रकल्प संस्थापक संचालक प्रशांत झाडे, कमलेश ओझे, संदीप सामंत, प्रवीण पठारे, हर्षल ओझे, वैभव कोतलापुरे, संदेश खामकर, सुरिंदर धीमन, निरंजन कडले, जयंत बांदेकर, साईनाथ हाडोळे, रोहित लोणकर, हिरेन पटेल, नवनीत तुली आदी संचालक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी