शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

शासनाने शाळा सुरू करण्याचे फर्मान मागे घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:31 IST

जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आहे. नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक - पालक सभा बोलावण्याचे काढलेले फर्मान तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाचे साकडे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले विविध मागण्यांचे निवेदन

सिन्नर : जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरूझाली आहे. नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक - पालक सभा बोलावण्याचे काढलेले फर्मान तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मागणी करण्यात आली आहे.१ नाशिक आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्त झाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॅनलाइन, टीव्ही, वर्कबुक, प्री लोडेड टॅब अशा सगळ्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे.२ कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा उघडण्यात येऊ नयेत. कोविड ड्यूटीवर असणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब परत बोलवावे. सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम पद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे. वर्क फ्रॉम होममध्ये वर्क लोड वाढतो ही बाब लक्षात घेऊन अन्य आस्थापनेवर गेलेल्या सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत पुन्हा बोलवावे.३ शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ क्लब करून, सुट्ट्या कमी करून झालेले शैक्षणिक नुकसान आम्ही शिक्षक भरून काढू, अशी ग्वाही देण्यात आली आहे. निवेदनावर कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, अशोक कदम, एम.व्ही. बच्छाव, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, माणीक मढवई आदींसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षºया आहेत.शाळा सुरू करायच्या किंवा कसे याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचाप्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणं धोकादायक ठरू शकेल.सध्या कोरोनाचा पाचवा आणि महाभयंकर टप्पा सुरूआहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत १ जुलैपासून शाळा सुरूकरणे योग्य वाटत नाही. ही भयानक परिस्थिती आटोक्यात येऊ द्या, मगच निर्णय घ्यावा. आम्ही सुट्टीच्या दिवशी शाळा चालवून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. मुलांना कोरोनाची लस मिळत नाही तोवर आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे पालकांचे स्पष्ट मत आहे.- एस.बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक संघ

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र