शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सरकारने महापालिकांना निधी द्यावा, कुठलेही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:34 IST

कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत

ठळक मुद्देकेवळ कागदावरच तयारी करून चालणार नाही‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’च्या तपासणीबाबत पुर्णपणे संभ्रममुंबईतील आकडा दिशाभूल करणारासरकारचे तीन ‘पॉवर सेंटर’ असल्यामुळेच ही अशी अवस्थाशरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते, हे दुर्दैव

नाशिक : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोरोना आजाराशी सामना करण्यासाठी मुबलक प्रमाणात निधीची उपलब्धतता केली जात आहे. सरकारने राज्यातील विविध महापालिकांनाही निधी वर्ग करून मदत करावी, यामध्ये कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत आहे, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशकात माध्यमांशी बोलताना म्हणाले.नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून सुमारे साडेपाच हजाराच्यापुढे कोरोनाबाधितांचा आकडा सरक ला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.८) फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले. शहरातील जिल्हा शासकिय रूग्णालय, नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय, महसूल कार्यालयांना भेटी देत त्यांनी भाजपा शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.यावेळी फडणवीस म्हणाले, रॅपिड अ‍ॅन्टिजन किट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे कोरोना निदानाच्या चाचण्यांचा वेग वाढणार आहे. सरकारकडून सर्व हॉटस्पॉटवर तातडीने तपासणी करण्याचे निर्देश स्थानिक मनपा व जिल्हा प्रशासनला दिले पाहिजे, तरच कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल. मनपा व जिल्हा प्रशासनाने कोरोनाशी दोन हात करताना केवळ कागदावरच तयारी करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात शहरात ती तयारी दिसून आली पाहिजे, असेही ते म्हणाले.मुंबईत ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’च्या तपासणीबाबत पुर्णपणे संभ्रमवस्था असून या तपासण्याच होत नसल्याची खंतही फडणवीस यांनी बोलून दाखविली. तसेच मास टेस्टिंगही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात कुठेही कोरोना नियंत्रणाबाबतची समाधानकारक स्थिती दिसत नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले.मुंबईतील आकडा दिशाभूल करणारामुंबईमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची आकडेवारी ही पुर्णत: दिशाभूल करणारी आहे. तपासण्या केवळ ३३०० झाल्या म्हणूनच कोरोनाबाधितांचा आकडा ८०६ आला. यापेक्षाही अधिक भीषण परिस्थिती मुंबईत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा कमी पुढे यावा, म्हणून तपासण्यासुध्दा कमी केल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आरोग्य प्रशासनावर केला.मुंबईकरांचे आरोग्य पुर्णपणे धोक्यात टाकले जात आहे, असेही यावेळी म्हणाले.अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुरघोडीचे राजकारणअधिका-यांच्या बदल्यांमध्ये गडबड म्हणजे केवळ कुरघोडीचे राजकारण आणि संवादहिनता असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला घेरताना बदल्यांप्रकरणात शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागते, हे सरकारचे दुर्दैव असल्याचे सांगितले. सरकारचे तीन ‘पॉवर सेंटर’ असल्यामुळेच ही अशी अवस्था होत असल्याचा चिमटाही त्यांनी काढला

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवार