शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी महसूलमंत्र्यांचा दिलासा : पीकपद्धतीत बदल

By admin | Updated: December 30, 2014 00:18 IST

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी महसूलमंत्र्यांचा दिलासा : पीकपद्धतीत बदल

  नाशिक : अतिवृष्टी, गारपीट व सातत्याने दुष्काळी परिस्थितीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, रोजगार हमी योजना, जलयुक्ती भूमी अभियान अशा कायम स्वरूपी व तात्पुरत्या योजना राबवितानाच पीकपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. शासकीय विश्रामगृहावर खडसे यांच्या उपस्थितीत महसूल, मदत व कार्य, पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, राज्य उत्पादन शुल्क या विभागाची बैठक घेण्यात आली. त्यात खडसे यांनी प्रत्येक विभागात सध्या सुरू असलेले काम व त्यात येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना खडसे यांनी, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी स्थायी व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, राष्ट्रीय फळबाग योजना, पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, वीजबिल माफी, जलसंधारण हे कामे करण्याबरोबरच शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील. त्यासाठी नवीन धोरण स्वीकारण्यात येत असून, सरकार स्वयंसेवी संस्था, वित्तसंस्था, विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे. प्रामुख्याने अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कर्ज व अडचणीतून सोडविण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील. त्यामध्ये नॅशनल हार्टीकल्चर मिशन, फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना,पीकपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कृषी संशोधन आणि कृषी मालाच्या विक्रीसाठी आडत व्यापारी, बाजार समिती यांच्याशी विचार विनिमय करून उपाययोजना आखल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि अधिकारी उपस्थित होते.