शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शासकीय उद्दिष्टपूर्ती !

By किरण अग्रवाल | Updated: April 8, 2018 01:21 IST

कागदावरील आकड्यांचा मेळ घालून अपेक्षित उद्दिष्टपूर्ती साधावी ती सरकारी यंत्रणांनीच. अशा पूर्ततेचा वास्तविकतेशी मेळ बसतोच, असे नाही.

ठळक मुद्देसारे मिळून ‘ढोल बजाओ’ वा गुणगान कार्यक्रमात सहभागी गावांत शिरण्यापूर्वी नाकाला रुमाल लावण्याची वेळ कागद आणि कागदावरील आकडे केवळ बोलतात‘मार्च एण्ड’ला मात्र अचानक ‘मुक्ती’ साधली गेली

कागदावरील आकड्यांचा मेळ घालून अपेक्षित उद्दिष्टपूर्ती साधावी ती सरकारी यंत्रणांनीच. अशा पूर्ततेचा वास्तविकतेशी मेळ बसतोच, असे नाही. पण सरकारही, म्हणजे यंत्रणेतील वरिष्ठाधिकारीदेखील ‘टार्गेट’शी निगडित विचारधारेत अडकलेले राहात असल्याने त्यांनाही चौकटबाह्य कामात रस नसतो. परिणामी सारे मिळून ‘ढोल बजाओ’ वा गुणगान कार्यक्रमात सहभागी होत असतात. हगणदारीमुक्तीबाबत तसेच काहीसे झालेले असावे. रामप्रहरीची पहिली ‘एसटी’ पकडून ग्रामीण भागात जाण्याची वेळ येते तेव्हा आजही अनेक गावांत शिरण्यापूर्वी नाकाला रुमाल लावण्याची वा डोळे मिटून घेण्याची वेळ येते, यात कसलीही अतिशयोक्ती नाही. उघड्यावरील ‘डब्बा परेड’धारकांची संख्या भलेही कमी झालेली असेल, नव्हे ती झाली आहेच; पण पूर्णत: संपलेली नाही. मुले आता शिकली-सवरली आहेत. त्यांच्यात स्वच्छतेबद्दलची जाणीवजागृती आहे. त्यामुळे हे प्रमाण घटले आहे; परंतु जुन्या वळणाने जाणारी, ‘बसणारी’ काही मंडळी आहेच. शिवाय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदान मिळवून अनेक ठिकाणी अनेकांनी शौचालये बांधलीही आहेत, मात्र गावकुसाबाहेरच्या अनधिकृत वस्तीधारकांचे वा झोपडपट्टीधारकांचे काय, हा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसणारे नसतील; पण शेतात-कड्याकपारीचा ‘आडोसा’ शोधणारे काही आहेतच. असे असताना नाशिक जिल्हा मात्र पूर्णत: शंभर टक्के हगणदारीमुक्त घोषित केला गेला आहे. जिल्ह्यातील सर्व १३६८ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त असल्याचे कागदपत्रांवर दिसून येत आहे. नाशिकप्रमाणेच महसूल विभागातील धुळे, नंदुरबार व अहमदनगर हे जिल्हेदेखील शंभर टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत म्हणे. खरेच विश्वास बसू नये असेच हे यश म्हणायचे. मागे असाच ‘स्वच्छ मालेगाव’चा ‘विनोद’ सरकारी पातळीवर घडविण्यात आला होता. कारण, सरकार दरबारी अडचणधारकांचे बोल ऐकले जात नाहीत. तेथे कागद आणि कागदावरील आकडे केवळ बोलतात. अमुक एक उद्दिष्ट घेतले, तेवढा आकडा गाठला म्हणजे झाले; मोहीम फत्ते. प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे बघायला सवड आहे कुणाकडे? हगणदारीमुक्तीचे तसेच झाले आहे. आता-आतापर्यंत टमरेल जप्तीच्या मोहिमा सुरू असताना ‘मार्च एण्ड’ला मात्र अचानक ‘मुक्ती’ साधली गेली. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २०१९ पर्यंत संपूर्ण देश हगणदारीमुक्त करायचा आहे; परंतु यातही आपला नंबर पहिला ठेवायची मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याने मार्च २०१८ पर्यंतच उद्दिष्ट साधायचे प्रशासनाचे प्रयत्न होते. अखेर ते त्यांनी करूनही दाखविले. अर्थात, कागदेच रंगवायचीत व आकडेच खेळायचे म्हटल्यावर त्यात अवघड अथवा अशक्य काय असते? प्रशासन त्यात वाकबगार असते. राजाला जे आवडते ते प्रधानजीला करणे भाग असते, अशातला हा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनाही घोषणाच आवडतात. मग त्यासाठी पूरक व्यवस्थेची काळजी प्रशासनाकडून वाहिली जाणे ओघाने आलेच. ती जबाबदारी निभावताना वास्तविकतेचा विचारच केला जात नाही. ग्रामीण भागात तरी हगणदारीमुक्ती शंभर टक्के साधली जाणे हे प्रथमदर्शनी अवघड वाटणारे काम आहे. ती ९९ टक्के साधली जाऊ शकेल, पण एक टक्क्याची तरी बाकी राहतेच राहते. मायबाप शासनाच्या कृपेने मात्र विभागात जळगावखेरीज चारही जिल्ह्यांत शंभर टक्केचा झेंडा गाडला गेला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय