शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:16 IST

सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे

नाशिक : नगर व नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पिण्यासाठी पाणी सोडणे गैर नसले तरी, याबाबत राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती़ पाणीप्रश्नाचे गांभीर्य नसल्याने व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी एस़ व्ही़ सोडल यांचा हट्ट पुरविण्यासाठीच राज्य सरकारने पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली़ जायकवाडी धरणाचा ५ टक्के जिवंत व २७ टक्के मृत असा ३२ टक्के साठा आहे़ मात्र त्याचा वापर करण्यासाठी जी इच्छाशक्ती हवी आहे ती सरकारकडे नाही़ नगर व नाशिकमधील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली होती; मात्र त्यांनी गांभीर्याने या प्रश्नाकडे बघितलेच नाही़मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हे सोडलेच पाहिजे यामध्ये मराठवाडा विरुद्ध नाशिक- नगर असा प्रादेशिक वाद आणणे चुकीचे आहे़ त्याऐवजी सर्वांनी एकत्र बसून यावर चर्चा करणे गरजेचे आहे़ धरणक्षेत्रातच पाऊस कमी पडल्याने धरणातील साठादेखील कमी आहे़ धरणातून पाणी सोडल्यानंतर, तसेच जनतेसह संपूर्ण व्यवस्थाच कोलमडल्यानंतर यावर चर्चा उपयोगाची नाही़ नाशिक व नगरमधील धरणक्षेत्रांमध्ये धरणे बांधू नयेत, असे कायद्यातच असल्याचे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी सांगतात़ मात्र नंतर करण्यात आलेल्या धरणांची परवानगी ही पूर्वीचीच आहे, मात्र निधीअभावी त्यांचे काम रखडलेले होते़ न्यायालयाच्या निकालाचे कारण पुढे करून अधिकारी आपली नोकरी बचावची भूमिका घेत आहेत़ नाशिकचे पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांच्यावर नाशिककरांची जबाबदारी आहे़ मात्र पाणी सोडण्याच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही़ राज्य सरकारने ज्या एस़ व्ही़ सोडल या अधिकाऱ्याच्या हट्टापायी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, चौकशीचे आदेश दिल्याचेही विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ या पाणीप्रश्नावर पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री महाजन यांनी चर्चा घडवून आणण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले़ (प्रतिनिधी)