शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2015 23:16 IST

सरकारला पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही : विखे

नाशिक : नगर व नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पिण्यासाठी पाणी सोडणे गैर नसले तरी, याबाबत राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता होती़ पाणीप्रश्नाचे गांभीर्य नसल्याने व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी एस़ व्ही़ सोडल यांचा हट्ट पुरविण्यासाठीच राज्य सरकारने पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली़ जायकवाडी धरणाचा ५ टक्के जिवंत व २७ टक्के मृत असा ३२ टक्के साठा आहे़ मात्र त्याचा वापर करण्यासाठी जी इच्छाशक्ती हवी आहे ती सरकारकडे नाही़ नगर व नाशिकमधील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली होती; मात्र त्यांनी गांभीर्याने या प्रश्नाकडे बघितलेच नाही़मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हे सोडलेच पाहिजे यामध्ये मराठवाडा विरुद्ध नाशिक- नगर असा प्रादेशिक वाद आणणे चुकीचे आहे़ त्याऐवजी सर्वांनी एकत्र बसून यावर चर्चा करणे गरजेचे आहे़ धरणक्षेत्रातच पाऊस कमी पडल्याने धरणातील साठादेखील कमी आहे़ धरणातून पाणी सोडल्यानंतर, तसेच जनतेसह संपूर्ण व्यवस्थाच कोलमडल्यानंतर यावर चर्चा उपयोगाची नाही़ नाशिक व नगरमधील धरणक्षेत्रांमध्ये धरणे बांधू नयेत, असे कायद्यातच असल्याचे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी सांगतात़ मात्र नंतर करण्यात आलेल्या धरणांची परवानगी ही पूर्वीचीच आहे, मात्र निधीअभावी त्यांचे काम रखडलेले होते़ न्यायालयाच्या निकालाचे कारण पुढे करून अधिकारी आपली नोकरी बचावची भूमिका घेत आहेत़ नाशिकचे पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांच्यावर नाशिककरांची जबाबदारी आहे़ मात्र पाणी सोडण्याच्या प्रश्नावर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही़ राज्य सरकारने ज्या एस़ व्ही़ सोडल या अधिकाऱ्याच्या हट्टापायी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून, चौकशीचे आदेश दिल्याचेही विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ या पाणीप्रश्नावर पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री महाजन यांनी चर्चा घडवून आणण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले़ (प्रतिनिधी)