शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप

By suyog.joshi | Updated: October 16, 2023 14:53 IST

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले.

नाशिक (सुयोग जोशी) : नांदेड आणि कळव्यात सरकारी रूग्णालयात झालेले मृत्यू म्हणजे मानवी चूक आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने वर्षभरापासून कोणतीही औषध खरेदी केली नाही की टेंडर काढले नाही. सरकारला फक्त ज्यात स्वारस्य आहे, त्याच बाबींची खरेदी केली जात असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू आपल्या घरोघरी’ असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना केला.

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले. काही महिन्यांपूर्वी कळव्याला असे तांडव झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शासनाच्या संदर्भ रूग्णालयात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी विविध विभागांना भेट देत माहिती घेतली. शिवाय जेथे जेथे मशिनरीची कमतरता आहे, त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. याबाबत सरकारला माहिती देण्यात यावी. मशिन खरेदीसाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येत त्याबाबत संदर्भ रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते बबनराव घोेलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेNandedनांदेडSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात