शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप

By suyog.joshi | Updated: October 16, 2023 14:53 IST

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले.

नाशिक (सुयोग जोशी) : नांदेड आणि कळव्यात सरकारी रूग्णालयात झालेले मृत्यू म्हणजे मानवी चूक आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने वर्षभरापासून कोणतीही औषध खरेदी केली नाही की टेंडर काढले नाही. सरकारला फक्त ज्यात स्वारस्य आहे, त्याच बाबींची खरेदी केली जात असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू आपल्या घरोघरी’ असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना केला.

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले. काही महिन्यांपूर्वी कळव्याला असे तांडव झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शासनाच्या संदर्भ रूग्णालयात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी विविध विभागांना भेट देत माहिती घेतली. शिवाय जेथे जेथे मशिनरीची कमतरता आहे, त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. याबाबत सरकारला माहिती देण्यात यावी. मशिन खरेदीसाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येत त्याबाबत संदर्भ रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते बबनराव घोेलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेNandedनांदेडSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात