शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप

By suyog.joshi | Updated: October 16, 2023 14:53 IST

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले.

नाशिक (सुयोग जोशी) : नांदेड आणि कळव्यात सरकारी रूग्णालयात झालेले मृत्यू म्हणजे मानवी चूक आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने वर्षभरापासून कोणतीही औषध खरेदी केली नाही की टेंडर काढले नाही. सरकारला फक्त ज्यात स्वारस्य आहे, त्याच बाबींची खरेदी केली जात असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू आपल्या घरोघरी’ असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना केला.

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले. काही महिन्यांपूर्वी कळव्याला असे तांडव झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शासनाच्या संदर्भ रूग्णालयात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी विविध विभागांना भेट देत माहिती घेतली. शिवाय जेथे जेथे मशिनरीची कमतरता आहे, त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. याबाबत सरकारला माहिती देण्यात यावी. मशिन खरेदीसाठी सरकारकडे आग्रह धरण्यात येत त्याबाबत संदर्भ रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते बबनराव घोेलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेNandedनांदेडSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात