शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुकणे पाणी योजनेप्रश्नी शासनाने मागविला अहवाल

By admin | Updated: June 27, 2015 01:07 IST

मुकणे पाणी योजनेप्रश्नी शासनाने मागविला अहवाल

नाशिक : मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेला राज्याच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिल्यानंतर आणि मुंबईत ९ जून रोजी राज्यमंत्र्यांनी महापालिका व तक्रारदार लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शासनाने महापालिकेकडे नऊ प्रश्नांची उत्तरे मागविली असून त्याबाबतचा खुलासा आणि एकूणच त्यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश काढले आहेत. शासनाच्या या भूमिकेमुळे महापालिकेने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. मुकणे पाणी योजनेला स्थगिती दिल्यानंतर राज्यमंत्र्यांनी मुंबईत त्यावर सुनावणीची बैठक घेतली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी काही मुद्दे शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याच मुद्यांचे स्पष्टीकरण आता नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महापालिकेकडे मागविल्याने पालिका प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. प्रामुख्याने बैठकीत लोकप्रतिनिधींनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्यात सदरची निविदा कोणतेही ठोस कारण नसताना इपीसी तत्त्वावर मागविण्यात आली. महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविलेला २६९ कोटींचा प्रस्ताव अवाजवी होता. महापालिकेने निविदा सादरीकरणासाठी दिलेला २० दिवसांचा कालावधी नियमानुसार नव्हता, महापालिकेच्या अभियंत्यांनी निविदा प्रक्रिया राबविताना घाई केल्याचे दिसून येते. ९ निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यापैकी ४ निविदाधारकांना अपात्र ठरवून ५ निविदाधारकांना पात्र ठरविणे व त्यानंतर निविदा पत्रके आॅनलाइन प्रसिद्ध करणे ही बाब निविदा प्रक्रियेशी सुसंगत नव्हती. काही अटी-शर्तींमध्येही बदल करण्यात आले. निविदा प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित करूनही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. जीवन प्राधिकरणच्या मूल्यांकनात तफावत आढळून येणे म्हणजे महापालिकेने बनविलेली निविदा प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या योग्य नव्हती. निविदा बयाणा रक्कम रोख स्वरूपात न घेता बॅँक गॅरंटीच्या स्वरूपात घेण्याचा निर्णय निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घेणे ही बाब कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन केलेलीआहे. निविदेमध्ये खर्चाचा मोठा भाग हा पाइप व पाइप स्पेशल्स यांच्याशी निगडित होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करूनही निविदा किमतीमध्ये कोणताही बदल महापालिकेने केला नाही आदि आक्षेप लोकप्रतिनिधींनी नोंदविले होते. २१ फेबु्रवारी २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली निविदा प्रक्रिया सुमारे १७ महिने होऊनही पूर्ण झाली नसल्याने ही बाब संबंधित अधिकाऱ्यांबाबत शंका निर्माण करणारी आहे. वारंवार शुद्धिपत्रके देणे, ती वर्तमानपत्रात न देता फक्त संकेतस्थळावर देणे, निविदा सादर करण्याच्या मुदतीनंतर मुदतवाढ देणे आदि बाबी पाहता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही निविदा तांत्रिकदृष्ट्या योग्य बनविलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेला मिळालेला निधी परत जाण्याची शक्यता असल्याची भीतीही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती. या साऱ्या आक्षेपांचा स्वयंस्पष्ट खुलासा आणि त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंत्र्यांनी महापालिकेकडून मागविला आहे. राज्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन हा अहवाल मागविल्याने महापालिकेची धावपळ उडाली आहे. अद्याप महापालिकेने खुलासा पाठविला नसल्याचे समजते. इन्फो शासनाने मागविलेल्या या खुलाशाबाबत तक्रारदार सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर निविदा प्रक्रियेतील अनियमिततेमुळेच आक्षेप नोंदविण्यात आल्याचे सांगितले. संबंधित कंपनीने अहमदनगर येथील बुरानगर ४४ गावांच्या पाणीपुरवठा योजनेत केलेले अर्धवट काम आणि जीवन प्राधिकरणने कंपनीकडून वसूल केलेली रक्कम याबाबतचा मुद्दाही शासनाच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. कंपनीने ३६ महिन्यांची मुदत असताना कामासाठी दहा वर्षे लावली आणि ४५ कोटींपैकी पाच कोटी रुपयांचे काम केलेच नसल्याचेही समोर आले असल्याचे बडगुजर यांनी स्पष्ट केले. तक्रारदार आमदार बाळासाहेब सानप यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.