शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

मंत्रालयाशी शासकीय पत्रव्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:18 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती.

ठळक मुद्देकार्यालयातच पत्रे पडून : मार्गदर्शन, प्रस्तावांचा ढीग विकासकामांबाबत कोणताही निर्णय होवू शकलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याचा शासकीय कामकाजावर झालेला विपरित परिणाम तीन महिन्यांनंतरही जाणवू लागला असून, या काळात शासनाकडून विविध आदेश, सूचना काढण्यात आल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी करताना येणाºया अडी अडचणी, शासनाचे मार्गदर्शन, विकासकामांचे प्रस्ताव व शासनाकडून लागणारी मंजुरी याबाबतचा पत्रव्यवहार त्या त्या शासकीय कार्यालयांमध्येच गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहे. प्रत्येक विभागाच्या टपाल विभागात मंत्रालयात पाठवायच्या टपालाचे गठ्ठे लागल्याचे चित्र दिसू लागले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती. शासनाच्या या अचानक लागू केलेल्या निर्णयाने विविध खात्यांमध्ये निर्णय प्रक्रियेत असलेल्या कामांना स्थगिती तर मिळालीच परंत त्याबरोबरची कायदोपत्री प्रक्रियाही थंडावली होती. मात्र लॉकडाऊनच्या अगोदर शाासकीय पातळीवरील अनेक निर्णयांसाठी मंत्रालयातील विविध खात्यांकडून मार्गदर्शन मागविण्यासाठी कार्यालयांंनी पत्रव्यवहारही केलेला होता. परंतु मंत्रालयातच मोजके कामकाज या काळात होवू शकल्यामुळे सर्वच खात्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स, निर्णयप्रक्रियेत असलेले विकासकामांबाबत कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. मंत्रालयात ही परिस्थिती असताना विभागीय कार्यालये, जिल्हास्तरीय कार्यालये व तालुकास्थित कार्यालयांमध्येदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. गेल्या तीन महिन्यांपासून शासन दरबारी करावयाच्या पत्रव्यवहाराचे गठ्ठे टपाल खात्यात पडून आहेत. एरव्ही दररोज मंत्रालयात शासकीय पातळीवर करण्यात येणाºया पत्रव्यवहारासाठी दररोज त्या त्या कार्यालयाचा एक व्यक्ती सायंकाळी सर्व महत्त्वाचे टपाल गोळा करून दुसºया दिवशी सकाळी मिळेल त्या वाहनाने मुंबईला रवाना होवून मंत्रालयात वा त्या त्या विभागाच्या मुख्यालयात जाऊन टपालाचे वाटप करून पुन्हा परत येत अशावेळी मुख्यालयात वा मंत्रालयात आपल्या विभागासाठी असलेले टपालदेखील तो घेऊन येत असल्याची पद्धत अवलंबली जात होती. परंतु तीन महिन्यांपासून टपाल जरी स्थानिक पातळीवर जमा होत असले तरी रेल्वे, एसटी खासगी वाहनांना कोरोनामुळे प्रतिबंध घालण्यात आला असल्याने वाहतुकीच्या साधनाअभावी टपाल जैसे थे पडून आहे. या टपालात अनेक महत्त्वाचे निर्णय, शासनाचे मार्गदर्शन, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, शासनाला पाठवायची महत्त्वाची माहिती टपालबंद झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक