शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सरकार बदलताच आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराबाबत दृष्टीकोनही बदलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:06 IST

नाशिक- आदिवासी विभागातील फर्निचर खरेदीत झालेला कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार गेल्या दोन ते तीन वर्षांंपासून गाजत होते. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. तेव्हा विरोधी पक्ष त्यावर तुटून पडले होते. परंतु सत्ताबदल झाला तेव्हाचे विरोधक आता सत्तेवर आले म्हणूनच की काय, परंतु सरकार बदलला आणि त्याबरोबरच आरोप करणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी हाच दृष्टीकोन मांडून भ्रष्टाचाराची हवाच काढून घेतली. त्यामुळे गेल्या सरकारात घोटाळा झालाच नव्हता की काय शंका देऊन त्यांनी गैरव्यवहार करणाऱ्यांना आणि भाजप सरकारलाही संशयाचा फायदाच दिला आहे.

ठळक मुद्देपाडवी यांचे अजब विधान मंत्री म्हणतात विरोधासाठी बोलावे लागतेम्हणजे गैरव्यवहार झालाच नव्हता का?

नाशिक- आदिवासी विभागातील फर्निचर खरेदीत झालेला कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार गेल्या दोन ते तीन वर्षांंपासून गाजत होते. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. तेव्हा विरोधी पक्ष त्यावर तुटून पडले होते. परंतु सत्ताबदल झाला तेव्हाचे विरोधक आता सत्तेवर आले म्हणूनच की काय, परंतु सरकार बदलला आणि त्याबरोबरच आरोप करणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी हाच दृष्टीकोन मांडून भ्रष्टाचाराची हवाच काढून घेतली. त्यामुळे गेल्या सरकारात घोटाळा झालाच नव्हता की काय शंका देऊन त्यांनी गैरव्यवहार करणाऱ्यांना आणि भाजप सरकारलाही संशयाचा फायदाच दिला आहे.

आदिवासींच्या उत्थानासाठी शासनाने आदिवासी विकास विभागासाठी विशेष निधीची तरतूद असते. राज्याच्या एकुण अर्थसंकल्पाच्या नऊ टक्के तरतूद या विभागासाठी केली जाते. मात्र, हा विभाग विकासापेक्षा भ्रष्टाचाराच्या कुरणामुळेच गाजतो. कधी मुलांचा आहार कधी खरेदी तर कधी नोकरभरती. या विभागाने अशा लक्ष्यवेधी कामगिरीमुळे आपले वैशिट्य टिकवून ठेवले आहे. गेल्या काही वर्षात या विभागात फर्नीचर खरेदीचा विषय विशेष गाजला. फर्निचर खरेदीसाठी तरतूद ११२ कोटी रूपयांची परंतु वाढता वाढता वाढे खरेदी या पध्दतीने खरेदी तीनशे कोटींवर गेली. विशेष म्हणजे खरेदीसाठी जास्तीत जास्त २५ लाख रूपयांचे विशेषधाधिकार अतिरीक्त आयुक्तांना तर ५० लाख रूपयांपर्यंतचे अधिकार आयुक्तांना असताना प्रत्यक्षात मात्र कोट्यवधी रूपयांच्या खरेदीसाठी याच अधिकारांचा (?) वापर झाला. त्यासाठी वित्तीय मान्यता हा भाग तर आणखीनच दुर. जेव्हा खरेदीची बिले लेखा विभागाला सादर करण्यात आली. तेव्हा त्यांनी वित्तीय मान्यता आणि अधिका-यांनी मर्यादेपेक्षा खरेदी कशी काय केली असा प्रश्न केला त्यानंतर मंजुरीचे सोपस्कार सुरू झाले. थोडक्यात, विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेवून सर्व काही सुरू होते. यासंदर्भात उच्च न्यायालयातही प्रकरण दाखल आहे.

नोकरभरतीही अशाच प्रकारची हाती. गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता असताना विष्णु सावरा आदिवासी विकास मंत्री होते. तरही तत्कालीन भाजपचेच खासदार असलेल्या हरीश्चंद्र चव्हाण यांनी हा गैरव्यवहार उघड केला होता. त्यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि भरती प्रकरणी त्यांनी गंभीर ठपकाही ठेवला होता.

फर्निचर खरेदी घोटाळ्याबाबत तेव्हा विरोधी पक्षात असलेले धनंजय मुंडे आणि विजय वडवेट्टीवार यांनी या विषयावरून भाजप सरकारला अडचणीत आणले होते. आज सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे चौकशी कॉँग्रेस आणि राष्टÑवादीच्या हातात असताना विद्यमान आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी मात्र सरकारच्याच भूमिकेबाबत संशय निर्माण करून दिला आहे. मुंडे आणि वडवट्टीवार यांनीच हा घोटाळा उघड केला असल्याचे त्यांना नाशिकमध्ये पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तेव्हा मुंढे आणि वडवट्टीवार विरोधी पक्षात होते. त्यामुळे तेव्हा असे बोलावेच लागते असे धक्कादायक विधान तर केलेच परंतु त्यानिमित्ताने गेल्या दोन तीन वर्षांपासून गाजत असलेल्या या घोटाळ्यात तथ्य तर नाहीच परंतु अप्रत्यक्षरीत्या भाजप सरकारलही क्लीन चीट दिली आहे.

सरकार बदलले की भूमिका बदलतात धोरणे बदलतात इतपर्यंत ठिक परंतु भ्रष्टाचाराची संकल्पना बदलून आरोप करणारे भलेही स्वपक्षाच असो त्यांनाच खोटे ठरविण्याचा अजब प्रकार दिसून आला आहे. अर्थात, नंतर मंत्री महोदयांनी या घोटाळ्याची पंधरा दिवसात चौकशी करू असे सांगून परिस्थती सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी ती कितपत गांभिर्यपूर्वक असेल याविषयी मात्र शंका घेणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाK. C. Padaviके. सी. पाडवी