शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यातच धन्यता : तपासात प्रगतीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 19:59 IST

नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाने कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीवर छापा मारून लाखो रुपयांची बनावट औषधे व प्रतिबंधक रासायनिक द्रव्ये जप्त केली होती. विशेषत: द्राक्ष मण्यांच्या वाढीसाठी व वजन भरण्यासाठी महत्त्वाच्या असणा-या सीपीपीयू सारख्या महागड्या औषधांची नक्कल करण्याचा प्रकार

ठळक मुद्दे शेतकरी फसवणुकीला मिळते प्रोत्साहन

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत नामांकित कंपन्यांच्या नावांची हुबेहूब नक्कल करून बनावट औषधांची निर्मिती व विक्री करणारे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असून, त्यांना शोध घेऊन त्यांचे दुकान, गुदामावर छापा मारण्याची कठीण कारवाई कृषी विभाग करीत असला तरी, त्या संदर्भात दाखल होणा-या गुन्ह्याच्या तपासात पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याचे आजवरच्या गुन्ह्यांच्या उलगड्यावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत विभागीय कृषी कार्यालयाने दीड डझनापेक्षा अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली असली त्यातून पोलिसांना फारसे काही निष्पन्न करता आलेले नाही.

नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाने कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीवर छापा मारून लाखो रुपयांची बनावट औषधे व प्रतिबंधक रासायनिक द्रव्ये जप्त केली होती. विशेषत: द्राक्ष मण्यांच्या वाढीसाठी व वजन भरण्यासाठी महत्त्वाच्या असणा-या सीपीपीयू सारख्या महागड्या औषधांची नक्कल करण्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला होता. दुकानमालक राजेंद्र मोदी व त्याचा सहकारी भानुशाली या दोघांच्या विरोधात कृषी विभागाने सरकारवाडा पोलिसांत तक्रार दिली असली तरी, तपासात पोलीस फार प्रगती करू शकलेले नाही. संबंधित दुकानमालक मोदी याने सदरची औषधे कोठून आणली, कोणाकोणाला विक्री केली याची माहिती पोलीस काढू शकलेले नाही. त्यामुळे या गुन्ह्यावर फारसा प्रकाशझोत पडू शकला नसल्याने बनावट औषध विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. राज्यात अशा प्रकारची बोगस औषधांची विक्री करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता कृषी विभाग व शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात आठ महिन्यांत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात वेदांत अ‍ॅग्रो, नोबल अ‍ॅग्रो, सुशांत बाहेती केमिकल्स, परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन, भूमी अ‍ॅग्रो, महाफिड आदी कंपन्यांचा समावेश आहे. नाशिकबरोबरच विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपींकडून गुन्ह्यावर प्रकाशझोत टाकू शकणारी माहिती पोलीस काढू शकलेले नाहीत. त्यामुळे एका ठिकाणावर छापे पडले की जागा बदलून नवीन दुकान थाटण्याचा प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक अटळ झाली आहे. पोलीस यंत्रणेने अजूनही या साºया प्रकरणांना गांभीर्याने घेतल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीPoliceपोलिस