शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशकात गोदावरीचे गटारीकरण, जलचर, माणसांचे आरोग्य बिघडले

By अझहर शेख | Updated: December 10, 2019 11:17 IST

नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते.

- अझहर शेखनाशिक - शहराला दररोज सुमारे ४.५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यातील ६५ टक्के सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळते. शहरात महापालिकेने उभारलेले मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र केवळ नावालाच असल्याने या नदीचे चक्क गटारीकरण झाले आहे. परिणामी, जलचरांसोबत माणसांचेही आरोग्य बिघडले असून, शेतीवरही विपरीत परिणाम होत आहे.नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. एकूण पाणीपुरवठ्यापैकी ६५ टक्के सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते.मलनिस्सारण केंद्रात प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाते, असा दावा पालिकेकडून केला जातो. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. त्यामुळे गोदावरीचे गटारीकरण झाले आहे.गोदा प्रदूषणावर महापालिकेकडून उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दर २ महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावयाचा आहे.361 गावे गोदेवर अवलंबूननाशिक, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या तीन तालुक्यांमधील सुमारे ३६१ गावे गोदावरीच्या खोºयावर अवलंबून आहेत. गोदेच्या प्रदूषणाचा या सर्व गावांना फटका बसत आहे.डोळ्यांची जळजळ आणि दुर्गंधीनाशिक व मराठवाडा मिळून सुमारे ६६ लाख हेक्टरपैकी १६ टक्के शेती क्षेत्राला गोदेच्या पाण्याचा फायदा झाला आहे. मात्र, प्रदूषित पाण्यामुळे गोदाकाठच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच गोदेकाठच्या नागरिकांना डोळ्यांची जळजळ, त्वचेला खाज सुटणे, डोकेदुखी, दुर्गंधी आदी आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो आहे. - देवांग जानी,अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती, नाशिक 

 

 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणgodavariगोदावरीNashikनाशिक