शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गोदावरीच्या पातळीत वाढ : पहाटेपर्यंत जोर ‘धार’; दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 17:46 IST

शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात केवळ दोन मिमी इतका पाऊस पडला; मात्र रात्री साडेआठवाजेपर्यंत पावसाचे प्रमाण १४ मि.मीवर पोहचले होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेपर्यंत शहरास जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवनावर प्रभाव पडला.

ठळक मुद्देअग्निशामक केंद्राकडून गोदाकाठालगत सतर्कतेच्या सूचनादुतोंड्या हनुमानाच्या मुर्तीच्या पायाला पाणी लागले

नाशिक : मागील दिड महिन्यांपासून नाशिककरांना पावसाच्या समाधानकारक वर्षावाची प्रतीक्षा होती. गेल्या बुधवारी पावसाचे जोरदार ‘कमबॅक’ झाल्यानंतर पुन्हा गती मंदावली होती. रिपरिप शुक्रवारपर्यंत सुरू होती; मात्र शनिवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर शहरासह जिल्ह्यात वाढल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ६० टक्क्यांवर पोहचला व रविवारी (दि.१५) गोदावरीच्या पातळीतही वाढ झाल्याचे चित्र होते. रविवारी पहाटेपर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची संततधार कायम होती.

रविवारपासून पावसाला दमदार सुरूवात झाली. शहरास जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ‘वीकेण्ड’ला वर्षासहलीसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला नाही. शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात केवळ दोन मिमी इतका पाऊस पडला; मात्र रात्री साडेआठवाजेपर्यंत पावसाचे प्रमाण १४ मि.मीवर पोहचले होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेपर्यंत शहरास जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवनावर प्रभाव पडला. दमदार हजेरीचा दिवस पावसाने रविवार निवडल्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थीवर्गाचे हाल झाले नाही. सकाळपासून शहरातील रस्ते ओस पडलेले होते. पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता. दुपारी तीन वाजेपासून पावसाने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अल्पशी विश्रांती घेतली. संततधार उघडल्याने नागरिक काही प्रमाणात रस्त्यावर आले. सकाळपर्यंत शहरात ५२ मि.मी व जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण ३१.३२ मि.मी इतके होते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कायम राहिल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती. सकाळी ६२ टक्क्यावर असलेला धरणसाठा दिवसभरात अधिक वाढला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. देवळा, नांदगाव, बागलाण, मालेगाव या तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गोदावरीच्या पातळीत वाढ झाल्याने पंचवटी अग्निशामक केंद्राकडून गोदाकाठालगतच्या विक्रेत्यांना व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. देवमामलेदार मंदिराचे पटांगण पाण्याखाली गेले होते. नाशिककरांचे पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या हनुमानाच्या मुर्तीच्या पायाला पाणी लागले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वरुणराजाची कृपादृष्टी उशिराने झाल्यामुळे गोदामाईचे खळाळलेले रुप नाशिककरांना विलंबाने पहावयास मिळाले.

जिल्ह्यातील पाऊस असा (मि.मीमध्ये)नाशिक : ५२.१/इगतपुरी : १५२.०/त्र्यंबकेश्वर : ९९/दिंडोरी : २०/पेठ : ८७/निफाड ८.४/सिन्नर : ५.२/चांदवड : २.२/देवळा : ०.०/येवला : २.०/नांदगाव : ०.०/मालेगाव :०.०/बागलाण : ०.०/कळवण : ५.०/सुरगाणा : ३६.५, कळवण ५.०

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी