शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:10 IST

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत.

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकदेखील गणेशवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजसमोरील भाजीबाजारात जाऊन खरेदी करू लागल्याने सुमारे दीड दशक लोंबकळलेला प्रश्न मार्गी लागला आहे.नाशकात २००३च्या कुंभमेळ्याच्या पूर्वीपासूनच भाजीबाजार अन्यत्र हटविण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला. त्यावेळी कुंभमेळा काळात भाजीविक्रेत्यांनी सहकार्य केल्याने तो वाद तात्पुरता शमला होता. परंतु, भाजीबाजारामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊन अस्वच्छतेमुळे येणाऱ्या भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच त्यामुळे भाविकांनाही अस्वच्छ नाशिकचे दर्शन घडते, असे आक्षेप घेत महापालिकेने भाजीबाजार हटविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे २००५ पासून गंगेवरील भाजीबाजाराचा वाद अधिकच चर्चेत राहू लागला. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून तसेच बॅरिकेड््स टाकून भाजीबाजार हटविण्याची कारवाई केली होती. दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजीविक्रे ता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या मोहिमेवर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर २०११ साली न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने गंगेवरील भाजीबाजार हटविण्यावरील स्थगिती उठविली. त्यानंतरदेखील ग्राहक येणार नाही, या भीतीपोटी प्रदीर्घ काळ भाजीविक्रेते या बाजारात स्थलांतरित झाले नव्हते. अखेरीस आता दीड दशकाच्या संघर्षानंतर बहुतांश भाजीबाजार गणेशवाडीत भरू लागला आहे.---------------------------४८६ ओट्यांचा बाजार४८६ ओट्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती. प्रारंभी या लिलावप्रक्रि येपासून गंगाघाटावरील विक्रे त्यांनी लांब राहणेच पसंद केले. मात्र, नंतर विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने त्यास शासकीय दरापेक्षा जास्त दराची बोली स्थानिकांनी लावली.------------------------------४आयुर्वेदिक कॉलेजसमोरील जागेत दहा कोटीरु पये खर्च करून पर्यायी भाजीमंडई बांधण्यात आली होती. मात्र, विक्र ेत्यांनी याठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला होता.--------------------भिकारी, गर्दुल्ल्यांचारात्री वावरदशकभर याच बाजारात मुक्काम टाकलेले भिकारी, गर्दुल्ले सध्यादेखील रात्रीच्या सुमारास पुन्हा भाजीबाजारात मुक्कामाला येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांकडून दिवसभर मिळणाºया प्रतिसादावर भाजीविक्रेते खूश असले तरी रात्री मात्र भिकारी, गर्दुल्ले परतत असल्याने त्यांचा महापालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त लावावा, अशी मागणी भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक