शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:10 IST

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत.

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकदेखील गणेशवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजसमोरील भाजीबाजारात जाऊन खरेदी करू लागल्याने सुमारे दीड दशक लोंबकळलेला प्रश्न मार्गी लागला आहे.नाशकात २००३च्या कुंभमेळ्याच्या पूर्वीपासूनच भाजीबाजार अन्यत्र हटविण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला. त्यावेळी कुंभमेळा काळात भाजीविक्रेत्यांनी सहकार्य केल्याने तो वाद तात्पुरता शमला होता. परंतु, भाजीबाजारामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊन अस्वच्छतेमुळे येणाऱ्या भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच त्यामुळे भाविकांनाही अस्वच्छ नाशिकचे दर्शन घडते, असे आक्षेप घेत महापालिकेने भाजीबाजार हटविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे २००५ पासून गंगेवरील भाजीबाजाराचा वाद अधिकच चर्चेत राहू लागला. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून तसेच बॅरिकेड््स टाकून भाजीबाजार हटविण्याची कारवाई केली होती. दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजीविक्रे ता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या मोहिमेवर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर २०११ साली न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने गंगेवरील भाजीबाजार हटविण्यावरील स्थगिती उठविली. त्यानंतरदेखील ग्राहक येणार नाही, या भीतीपोटी प्रदीर्घ काळ भाजीविक्रेते या बाजारात स्थलांतरित झाले नव्हते. अखेरीस आता दीड दशकाच्या संघर्षानंतर बहुतांश भाजीबाजार गणेशवाडीत भरू लागला आहे.---------------------------४८६ ओट्यांचा बाजार४८६ ओट्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती. प्रारंभी या लिलावप्रक्रि येपासून गंगाघाटावरील विक्रे त्यांनी लांब राहणेच पसंद केले. मात्र, नंतर विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने त्यास शासकीय दरापेक्षा जास्त दराची बोली स्थानिकांनी लावली.------------------------------४आयुर्वेदिक कॉलेजसमोरील जागेत दहा कोटीरु पये खर्च करून पर्यायी भाजीमंडई बांधण्यात आली होती. मात्र, विक्र ेत्यांनी याठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला होता.--------------------भिकारी, गर्दुल्ल्यांचारात्री वावरदशकभर याच बाजारात मुक्काम टाकलेले भिकारी, गर्दुल्ले सध्यादेखील रात्रीच्या सुमारास पुन्हा भाजीबाजारात मुक्कामाला येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांकडून दिवसभर मिळणाºया प्रतिसादावर भाजीविक्रेते खूश असले तरी रात्री मात्र भिकारी, गर्दुल्ले परतत असल्याने त्यांचा महापालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त लावावा, अशी मागणी भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक