शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठावरील भाजीबाजार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:10 IST

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत.

नाशिक : गत शतकापेक्षाही अधिक काळापासून गोदाकाठावर बसणारा भाजीबाजार कोरोना लॉकडाऊननंतर कायमस्वरूपी इतिहासजमा झाला आहे. आता बहुतांश भाजीविक्रेते त्यांना निर्धारित करून दिलेल्या गणेशवाडीतील भाजीबाजारातच दुकान मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकदेखील गणेशवाडीतील आयुर्वेदिक कॉलेजसमोरील भाजीबाजारात जाऊन खरेदी करू लागल्याने सुमारे दीड दशक लोंबकळलेला प्रश्न मार्गी लागला आहे.नाशकात २००३च्या कुंभमेळ्याच्या पूर्वीपासूनच भाजीबाजार अन्यत्र हटविण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला. त्यावेळी कुंभमेळा काळात भाजीविक्रेत्यांनी सहकार्य केल्याने तो वाद तात्पुरता शमला होता. परंतु, भाजीबाजारामुळे गोदावरीचे प्रदूषण होऊन अस्वच्छतेमुळे येणाऱ्या भाविकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच त्यामुळे भाविकांनाही अस्वच्छ नाशिकचे दर्शन घडते, असे आक्षेप घेत महापालिकेने भाजीबाजार हटविण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे २००५ पासून गंगेवरील भाजीबाजाराचा वाद अधिकच चर्चेत राहू लागला. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी पाण्याचा मारा करून तसेच बॅरिकेड््स टाकून भाजीबाजार हटविण्याची कारवाई केली होती. दरम्यान, २००७ मध्ये गंगामाई भाजीविक्रे ता संघाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर भाजीबाजार हटविण्याच्या मोहिमेवर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर २०११ साली न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.दरम्यान, महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयाने गंगेवरील भाजीबाजार हटविण्यावरील स्थगिती उठविली. त्यानंतरदेखील ग्राहक येणार नाही, या भीतीपोटी प्रदीर्घ काळ भाजीविक्रेते या बाजारात स्थलांतरित झाले नव्हते. अखेरीस आता दीड दशकाच्या संघर्षानंतर बहुतांश भाजीबाजार गणेशवाडीत भरू लागला आहे.---------------------------४८६ ओट्यांचा बाजार४८६ ओट्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली होती. प्रारंभी या लिलावप्रक्रि येपासून गंगाघाटावरील विक्रे त्यांनी लांब राहणेच पसंद केले. मात्र, नंतर विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने त्यास शासकीय दरापेक्षा जास्त दराची बोली स्थानिकांनी लावली.------------------------------४आयुर्वेदिक कॉलेजसमोरील जागेत दहा कोटीरु पये खर्च करून पर्यायी भाजीमंडई बांधण्यात आली होती. मात्र, विक्र ेत्यांनी याठिकाणी स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला होता.--------------------भिकारी, गर्दुल्ल्यांचारात्री वावरदशकभर याच बाजारात मुक्काम टाकलेले भिकारी, गर्दुल्ले सध्यादेखील रात्रीच्या सुमारास पुन्हा भाजीबाजारात मुक्कामाला येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांकडून दिवसभर मिळणाºया प्रतिसादावर भाजीविक्रेते खूश असले तरी रात्री मात्र भिकारी, गर्दुल्ले परतत असल्याने त्यांचा महापालिकेने कायमस्वरूपी बंदोबस्त लावावा, अशी मागणी भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक