शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कुशल कामगारांची जागतिक स्तरावर गरज : राजेश मानकर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST

---- जगभरात सर्वत्र सध्या नोकर कपात, खासगीकरण, ऑनलाईन सुविधा अशा विविध कारणांमुळे नोकरीच्या संधी संकुचित होत असल्याचे मानले जात ...

----

जगभरात सर्वत्र सध्या नोकर कपात, खासगीकरण, ऑनलाईन सुविधा अशा विविध कारणांमुळे नोकरीच्या संधी संकुचित होत असल्याचे मानले जात असले तरी ते अर्ध सत्य आहेे. शासकीय क्षेत्रात उपलब्ध नोकऱ्यांची संख्या घटत असली तरी दरवर्षी अनेक कार्यालये व प्रकल्पांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. खासगी क्षेत्रात तर आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधी जणू वाटच पाहत आहेत. देशात दहावी, बारावीनंतर तांत्रिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पदवीधर निर्माण होत आहेत. मात्र, त्यांना नोकरीच्या संधी त्या प्रमाणात उपलब्ध होतात का हा कायमस्वरूपी निरुत्तर असलेला प्रश्न आहे. त्यामुळे हजारो शिक्षित तरुणांना अल्पवेतनावर काम करावे लागत आहे. अन्यथा या तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असताना याउलट आयटीआयमधील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाची गरज आहे. आयटीआयमध्ये एक किंवा दोन वर्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिसशिप) करून प्रशिक्षणार्थी थेट कोणतीही खासगी कंपनी, शासकीय आस्थापना केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग अथवा उपक्रमांमध्ये सक्षम ठरतो. त्याचप्रमाणे तो स्वयंरोजगाराच्या दृष्टीनेही सक्षम होत असल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करून अन्य अर्धकुशल व बेरोजगार तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम ठरू शकतो. थोडक्यात, जगभरात विविध क्षेत्रात कुशल कामगार व कारागिरांची गरज आहे. त्यासाठी केवळ तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.