शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वसाका चालविण्यासाठी सक्षम पर्याय द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:56 IST

राहुल अहेर : २५ वर्षे कराराबाबतची चर्चा निरर्थक

ठळक मुद्देवसाका भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत सध्या कसमादे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत

देवळा:- वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याऐवजी दुसरा कोणताही सक्षम पर्याय असेल तर आजही आपण सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिली.देवळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. वसाका भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत सध्या कसमादे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.  आमदार डॉ. राहुल अहेर यांनी सांगितले, वसाकावर राज्य सहकारी बँकेसह इतर बँकांची देणी, ऊस उत्पादकांची देणी, कामगारांची देणी व इतर सर्व देणी अशी एकूण देणी ४०२ कोटी रूपये असल्याने कोणतीही वित्तीय संस्था कारखान्याला अर्थसाहाय्य करण्यास राजी नाही. अशा बिकट परिस्थितीत राज्य सहकारी बँकेने वसाका भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेतला आहे, ती प्रक्रि या होत असताना ऊस उत्पादक व कामगारांना त्यांचे पैसे मिळावेत असा आपला आग्रह होता.त्या पाशर््वभूमीवर करार होत असताना राज्य सहकारी बँकेने भाडेतत्वावर कारखाना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस उत्पादकांच्या देणीसह कामगार, ऊस वाहतूकदार,ऊस तोडणी कामगार यांना गळीत हंगाम चालू होण्याअगोदर पैसे प्राप्त होणार आहेत. तसेच करारातील अटीनुसार दरवर्षी १ कोटी रु पयांबरोबर राज्य बँकेला देण्यात येणाऱ्या प्रति मेट्रिक टन गाळपापोटी देण्यात येणा-या रकमेच्या ५० टक्के रक्कम कामगारांच्या मागील देणीत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी दिली. चर्चेला कोणताही अर्थ नाहीराज्य सहकारी बँकेचे वसाकावर ९४ कोटी रु पये कर्ज असून कारखाना सुस्थितीत चालला तर त्याची लवकरात लवकर परतफेड होऊन संबंधित व्यक्तीचा करार त्यानंतर अवघ्या तीन वर्षामध्येच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कारखाना २५ वर्षांसाठी कराराने देण्यात आल्याच्या चर्चेला कोणताही अर्थ नाही, असेही आमदार डॉ. राहुल अहेर स्पष्ट केले. वसाका कार्यक्षेत्रातील उसाची प्राप्त परिस्थिती पाहता कारखाना कधीही पूर्ण क्षमतेने चाललेला नाही त्यामुळे २०१२ पासून १७ मेगा वॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प चालू करता आला नाही. अशी प्राप्त परिस्थिती असताना कारखाना सात ते आठ वर्षात कर्जमुक्त होईल असे म्हणणे चुकीचे आहे, असे अहेर म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक