शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या बहाण्याने गेलेल्या मुलींचा अवघ्या चोवीस तासात शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:01 IST

नाशिक : शाळेच्या बहाण्याने घरातुन गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा अंबड पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात शोध लावल असून त्यांना सोलापुर येथुन ताब्यात घेतले़ आपल्या मुली सुखरुप असून त्या पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे कळल्यानंतर या पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले.

नाशिक : शाळेच्या बहाण्याने घरातुन गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा अंबड पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात शोध लावल असून त्यांना सोलापुर येथुन ताब्यात घेतले़ आपल्या मुली सुखरुप असून त्या पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे कळल्यानंतर या पालकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटीलनगर, उंटवाडी, मटाले मळा या परिसरातील तीन मैत्रिणी मंगळवारी (दि़४) दुपारी शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरातुन बाहेर पडल्या होत्या़ आठवीच्या इयत्तेत शिकणा-या या मुली सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र त्या न सापडल्याने अंबड पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार केली़

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवीली. यानंतर या तीनही शाळकरी मुलींना सोलापुर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले. या मुली घरातुन निघुन नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे पोहोचल्या व तेथून दौंडमार्गे सोलापुरात पोहोचल्या. यापैकी एका मुलीने घरातुन एक हजार चारशे रुपये व आईची सोन्याची पोथ चोरून नेली होती.

दरम्यान, या मुलींना ताब्यात घेण्यासाठी अंबड पोलीसांचे एक पथक सोलापुर कडे रवाना झाले आहे.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकPoliceपोलिस