शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गझलकार कमलाकर देसले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 01:47 IST

जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

नाशिक : जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कमलाकर आत्माराम देसले यांचा जन्म २४ मे १९६३ रोजी झाला. एम. ए. बी.एड. पदवी घेतलेले देसले यांनी दीर्घकाळ झोडगे येथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. देसले यांचे ‘ ज्ञानिया तुझे पायी’, ‘काळाचा जरासा घास’ हा गझलसंग्रह, कवी खलील मोमीन व कमलाकर देसले यांच्यात प्रदीर्घ काळ चाललेल्या कवितेतल्या पत्रव्यवहारावर आधारित ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘काही श्वास विश्वासाठी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिकांमधूनही सातत्याने लेखन केले. त्यात लोकमतमध्ये लिहिलेले ‘अन्वयाचेनी आधारे’ हे स्तंभलेखनही गाजले. याशिवाय नवरस, सगुण-निर्गुण, अन्वयाची फांदी, प्रकट गुह्य बोले, मशागत हे स्तंभलेखन त्यांनी विविध वृत्तपत्रांतून केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (द्वितीय)अभ्यासक्रमात त्यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला होता तर पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमात देखील तीन गझलांचा समावेश होता. काही ग्रंथांचे त्यांनी संपादन व अनुवादही केले होते. देसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात सह्याद्री वाहिनी व रंगबावरी संस्था मुंबईचा महाकवी कालिदास राज्यस्तरीय पुरस्कार, धरणगावचा राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार, उदगीरचा राज्यस्तरीय साहित्य प्रबोधन पुरस्कार, नांदगावचा राज्यस्तरीय समता काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार, नाशिकच्या सावानाचा कवी गोविंद पुरस्कार, साहित्य सावाना पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, माउली साहित्य भूषण पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी पुण्याचा अध्यापकोत्तम पुरस्कार, कसमादे गौरव पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कवी देसले यांनी चित्रपटांसाठीही गीतलेखन केले आहे.

‘मोल' या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले असून त्यांची गीते गायक सुरेश वाडकर, केतकी माटेगावकर, मंदार आपटे यांनी गायिली आहेत. 'ओ तुनी माय' या अहिराणी चित्रपटासाठी गीतलेखन तसेच संजय बानुबाकोडे यांनी संगीतबद्ध केलेल्या

‘हीच माझी दौलत’ या अल्बमसाठी गझललेखन केले आहे. ज्ञानेश्वरीवर, कवितेवर त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली आहेत. रसाळ व मधुर वाणीतून त्यांची होणारी व्याख्याने श्रोत्यांना नेहमीच भावली.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू