शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

गझलकार कमलाकर देसले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 01:47 IST

जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

नाशिक : जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कमलाकर आत्माराम देसले यांचा जन्म २४ मे १९६३ रोजी झाला. एम. ए. बी.एड. पदवी घेतलेले देसले यांनी दीर्घकाळ झोडगे येथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. देसले यांचे ‘ ज्ञानिया तुझे पायी’, ‘काळाचा जरासा घास’ हा गझलसंग्रह, कवी खलील मोमीन व कमलाकर देसले यांच्यात प्रदीर्घ काळ चाललेल्या कवितेतल्या पत्रव्यवहारावर आधारित ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘काही श्वास विश्वासाठी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिकांमधूनही सातत्याने लेखन केले. त्यात लोकमतमध्ये लिहिलेले ‘अन्वयाचेनी आधारे’ हे स्तंभलेखनही गाजले. याशिवाय नवरस, सगुण-निर्गुण, अन्वयाची फांदी, प्रकट गुह्य बोले, मशागत हे स्तंभलेखन त्यांनी विविध वृत्तपत्रांतून केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (द्वितीय)अभ्यासक्रमात त्यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला होता तर पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमात देखील तीन गझलांचा समावेश होता. काही ग्रंथांचे त्यांनी संपादन व अनुवादही केले होते. देसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात सह्याद्री वाहिनी व रंगबावरी संस्था मुंबईचा महाकवी कालिदास राज्यस्तरीय पुरस्कार, धरणगावचा राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार, उदगीरचा राज्यस्तरीय साहित्य प्रबोधन पुरस्कार, नांदगावचा राज्यस्तरीय समता काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार, नाशिकच्या सावानाचा कवी गोविंद पुरस्कार, साहित्य सावाना पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, माउली साहित्य भूषण पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी पुण्याचा अध्यापकोत्तम पुरस्कार, कसमादे गौरव पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कवी देसले यांनी चित्रपटांसाठीही गीतलेखन केले आहे.

‘मोल' या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले असून त्यांची गीते गायक सुरेश वाडकर, केतकी माटेगावकर, मंदार आपटे यांनी गायिली आहेत. 'ओ तुनी माय' या अहिराणी चित्रपटासाठी गीतलेखन तसेच संजय बानुबाकोडे यांनी संगीतबद्ध केलेल्या

‘हीच माझी दौलत’ या अल्बमसाठी गझललेखन केले आहे. ज्ञानेश्वरीवर, कवितेवर त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली आहेत. रसाळ व मधुर वाणीतून त्यांची होणारी व्याख्याने श्रोत्यांना नेहमीच भावली.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू