शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:35 IST

दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिक : दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.  अकरावीची प्रवेशप्रक्रिया वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रि या पूर्ण केल्या नाहीत त्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरून त्याची पडताळणी झाल्यानंतर भाग-२ भरावा लागणार आहे. भाग-२ साठी कोणतीही पडताळणी करावी लागणार नाही.या प्रवेशप्रक्रियेत १३ ते २९ जून या कालावधीत बायोफोकल, इनहाउस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश करण्यात येणार आहे. दरम्यान, १३ ते १८ जून (६ दिवस) द्विलक्षी बायोफोकल विषयांचे पसंतीक्रम भरणे व कोटा प्रवेशांतर्गत इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी महाविद्यालय स्तरावर विविध विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारणे, कोटा प्रवेशाची गुणवत्ता यादी महाविद्यालय स्तरावरून जाहीर करणे व झालेले कोटा प्रवेश महाविद्यालयाकडून केंद्रीय प्रवेश प्रणाली अद्ययावत करणे ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, २९ जूनपर्यंत बायोफोकल प्रवेशप्रक्रियाही पूर्ण होणार असून, याच दिवशी नियमित अकरावी प्रवेशासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार  आहे.  दरम्यान, बायोफोकोलच्या २५ टक्के राखीव जागांसाठी आतापर्यंत प्रवेश जाहीर झाले असून, दुसºया फेरीत शुक्रवारपर्यंत (दि. २९) प्रवेश घेता येणार आहे. २३ हजार विद्यार्थ्यांनी भरले दोन्ही भागअकरावी प्रवेशासाठी नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे २७ हजार ९०० उपलब्ध जागांसाठी २७ हजार ५८३ आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचा भाग दोन भरून अर्ज सबमिट केला आहे. यात २७३ विद्यार्थ्यांनी बायोफोकलच्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी उपलब्ध पर्याय निवडला असून, २२ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी विविध शाखा व महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदवून त्यांचे आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालय