शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सामान्यांना नाही मास्कची गरज : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:26 IST

हाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून किंवा गडबडून जाण्यासारखी स्थिती अजिबात नाही. तसेच सामान्यांनी मास्क वापरण्याचीदेखील आवश्यकता नाही. केवळ गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रुमाल बांधला तरी पुरेसा असल्याचे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना आश्वस्त केले.

ठळक मुद्दे स्वच्छ रुमाल वापरण्याचा दिला सल्ला

नाशिक : महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून किंवा गडबडून जाण्यासारखी स्थिती अजिबात नाही. तसेच सामान्यांनी मास्क वापरण्याचीदेखील आवश्यकता नाही. केवळ गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रुमाल बांधला तरी पुरेसा असल्याचे सांगत राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना आश्वस्त केले.एका रुग्णालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्यमंत्रीनाशिकमध्ये आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ संसर्गाच्या भीतीमुळे लोक मास्क आणि सॅनेटायझर्सची खरेदी करीत आहेत. वास्तविक मास्क वापरण्याची गरज आहे काय? असा सवालदेखील टोपे यांनी उपस्थित केले. ज्या व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, डॉक्टर्स आहेत, रुग्णालयांचे स्टाफ आहेत, त्यांनीच या साधनांचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. या आजाराचा व्हायरस हवेत पसरत नाही. केवळ करोनाग्रस्त रुग्णाला हातमिळविणी केल्यास किंवा त्याच्या थुंकीच्या संपर्कात आल्यास हा आजार होतो. त्यामुळे उगाचच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी भीतीच्या वातावरणात वावरूनये.केवळ स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्र वारी दुपारी दीड ते अडीच वाजेदरम्यान विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हीसीच्या माध्यमातून चर्चा करीत कोरोना आजाराचा आढावा घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच या आजाराशी लढा देण्यासाठी देशातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.संदर्भ रुग्णालयात रेडिएशनसह किडनी ट्रान्सप्लांटविभागीय संदर्भ रुग्णालयात सध्या बंद पडलेला रेडिएशन विभाग पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, त्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेला किडनी ट्रान्सप्लांट विभागालादेखील लवकरात लवकर मंजुरी देण्याबाबतची पूर्तता करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी नमूद केले.तर संबंधितांवर कारवाईमूळ किमतीपेक्षा अधिक दराने एखादी वस्तू विकल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करता येते. त्याबाबतचे कायदेही अस्तित्वात आहेत. त्यामुळे कोणी मास्कचा व सॅनेटायझर्सचा काळा बाजार करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आतापर्यंत आम्ही मास्कचा काळाबाजार करू नये याविषयी आवाहन करीत होतो. परंतु विक्रे त्यांनी हे प्रकार थांबविलेच नाहीत, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यRajesh Topeराजेश टोपे