शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाणी परवानगीचे गौडबंगाल, ५७९ शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:13 IST

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : नव्याने अर्जाच्या अटीमुळे शेतकरी संतप्त

घोटी : नाशिक पाटबंधारे विभागाने धरणांच्या लाभक्षेत्रातुन व पाणलोट क्षेत्रातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या वर्षी ५७९ शेतकºयांनी केलेल्या मागणी अर्जावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे गंभीर चित्र आहे. अर्ज सादर करूनही अद्याप पाणी परवानग्या दिल्या नसतांनाही एकीकडे परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सुपिक जमिनी धरणासाठी संपादित झाल्याने शेतकºयांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. यानंतर झालेल्या धरणाच्या उंची वाढीसाठी भूसंपादन झाले. त्यामुळे अनेक कुटुंब पूर्णत: भूमिहीन झाले. काही शेतकºयांनी उरलेल्या माळरानावर उदनिर्वाहासाठी जमीन सपाटीकरण करून ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षी नाशिक पाटबंधारे खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करु न पाणी परवानगीसाठी अर्ज केले. संबंधितांनी वेगवेगळ्या जाचक अटी लादत अनेक प्रकारचे कागदपत्र मागवले. यानंतर शेतकºयांनी सर्व अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता केली. तथापि पाटबंधारे विभागाने शेतकºयांना प्रतिक्षेतच ठेवले. प्रदीर्घ कालावधीनंतर काही शेतकºयांना ठराविक कालावधीसाठीच परवानग्या देण्यात आल्या. मात्र आता अनेक अर्जदार शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी परवानगीसाठी वर्षापूर्वी अर्ज केले आहेत. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे यांनी शेतकºयांच्या बैठका घेऊन २०१८ मध्ये सामुहिक पाणी परवानगीसाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. मागणी अर्ज करून वर्ष झाले तरी यावर्षी नव्याने अर्ज करण्याचे विभागाने सांगितल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.याप्रश्नी नवीन आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक