शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्याने की टवाळखोरांचे अड्डे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:13 IST

महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे.

सातपूर : महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक-९ मधील उद्याने याला अपवाद नाहीत. या प्रभागातील उद्यानांकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. उद्याने वाचविण्यासाठी स्थानिक नगरसेवक तक्रारी करतात, परंतु त्याची दखल मात्र प्रशासन घेत नाही. काही ठिकाणी स्थानिक नगरसेवक स्वखर्चाने देखरेख करीत असल्याने ही उद्याने जिवंत आहेत.प्रभाग क्रमांक नऊमध्ये उद्यानांसाठी मोठ्या प्रमाणात भूखंड राखीव ठेवण्यात आलेली आहेत. त्यातील बहुतांश उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये वृक्षलागवड करून उद्याने जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. बहुतांश उद्यानांमध्ये ‘ग्रीन जिम’ आणि खेळणी बसविण्यात आली आहेत. हिरवळ लावण्यात आली आहे. परंतु केवळ देखभालीअभावी ही उद्याने ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. काही उद्यानांमध्ये हिरवळ जतन करण्यासाठी पाण्याची पुरेशी सोय नाही. काही उद्यानांमध्ये बोअर असून नसल्यासारखी आहे. उद्यानातील कारंजे नादुरु स्त अवस्थेत आहेत. साफसफाई नियमित होत नाही. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. काही उद्यानांमध्ये केवळ हिरवळ आहे. त्यात पाहिजे त्या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. मीनाताई ठाकरे उद्यानातील खेळणी दुरु स्त करण्याची मागणी होत आहे. श्रमिकनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात टवाळखोरांचा आणि मद्यपींचा अड्डा तयार झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अर्थात, कोणत्याही उद्यानात महापालिकेने देखभाल करण्यासाठी कोणालाही नेमलेले नाही. सुरक्षारक्षकाची (वॉचमन) नेमणूक केलेली नाही. त्यामुळे उद्यानातील खेळणी नादुरु स्त अवस्थेत आहेत. उद्यानांची प्रवेशद्वार मोडकळीस आलेले आहेत. उद्यानांच्या संरक्षक जाळ्यांचा वापर महिला कपडे सुकविण्यासाठी करीत आहेत. लहान मुलांची खेळणी मोठी मुले, माणसे खेळताना दिसतात. उद्यानातील झाडांना आणि हिरवळीला पाणी देण्याची सोय नाही. या दुरवस्था महापालिका प्रशासनाने थांबविणे गरजेचे आहे.टवाळखोरांचा नागरिकांना त्रासनागरिकांसाठी ही उद्याने असली तरी काही उद्यानांमध्ये टवाळखोर आणि मद्यपींचा धिंगाणा आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रेमी युगुलांसाठी ही उद्याने आणि उद्यानातील वृक्ष मोठे आधार ठरत आहेत. विशेत: श्रमिकनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात हे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकार वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात अनर्थ घडू शकतील. त्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.नगरसेवक खर्चातून उद्याने जगवण्याचा प्रयत्नमहानगरपालिका प्रशासन उद्यानांची व्यवस्थित देखभाल करीत नाही म्हणून स्थानिक नगरसेवकांनी स्वखर्चाने आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरजू कुटुंबांना उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. देखभाल करणाºयांना दरमहा मानधन (वेतन) दिले जात आहे. त्यामुळे ही उद्याने जिवंत आहेत. वास्तविक ही जबाबदार महानगरपालिका प्रशासनाची घेणे अपेक्षित आहे. शिवाजीनगर येथील भवर टॉवरजवळील उद्यानाची कोणीही देखभाल करीत नसल्याने या उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे.उद्यानाच्या देखभाली-साठी वाचमन नेमला पाहिजे. उद्यानाचा अजून विकास करावा. साफसफाई नियमित करण्यात यावी. लहान मुलांसाठी वेगळी खेळणी बसविण्यात यावीत. महिला व्यायामासाठी येतात. त्यांना असुरिक्षत वाटू नये.  - नाना शिवाजी केतान, नागरिकप्रभागातील कोणत्याही उद्यानात सुरक्षारक्षक नाहीत. सुविधा नाहीत. साफसफाई नियमित होत नाही. काही उद्यानात कचºयाचे ढीग आहेत. उद्याने चांगली आहेत. परंतु केवळ देखभालीअभावी उद्यानांची दुरवस्था निर्माण होऊ शकते. महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.  - गणेश पाटील, स्थानिक नागरिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक