शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:16 IST

शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यासाठी रोज दहा नागरिकांची नावे घंटागाडी ठेकेदारांना देण्याचा फतवा काढल्याचे समजते. निष्क्रिय आरोग्य विभागाने नागरिकांच्या प्रबोधनाबाबत काहीही उपाययोजना न राबविता घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

नाशिक : शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यासाठी रोज दहा नागरिकांची नावे घंटागाडी ठेकेदारांना देण्याचा फतवा काढल्याचे समजते. निष्क्रिय आरोग्य विभागाने नागरिकांच्या प्रबोधनाबाबत काहीही उपाययोजना न राबविता घंटागाडी ठेकेदा रांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.  घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रत्येक नागरिकाने ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकायचा आहे. शिवाय, ठेकेदारानेही विलगीकरण करूनच तो खतप्रकल्पावर न्यायचा आहे. शहरात सद्यस्थितीत घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण अवघे ३० टक्के असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी काही विभागात घंटागाडी ठेकेदारांमार्फत ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नागरिकांना हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते. परंतु, ठराविक नागरिकांपर्यंतच हा उपक्रम पोहोचला. त्यानंतर आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा विलगीकरणासाठी शहरातील व्यापारी पेठात हिरव्या आणि निळ्या रंगांच्या डस्टबिन बसविल्या. परंतु, या डस्टबिन खरेदीतील घोटाळा समोर आला. त्याबाबत प्रशासनाने मात्र, कुठलीही चौकशी केलेली नाही. आता ३१ मार्चअखेर घनकचरा विलगीकरण बंधनकारक केले असून, ते उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे. महापालिकेचा निष्क्रिय आरोग्य विभाग मात्र, त्याबाबत प्रबोधनपर उपाययोजना राबविण्यात कमी पडत आहे. त्यामुळेच प्रशासनाने आता घंटागाडी ठेकेदारांवर दबाव वाढविला असून, घंटागाडी ठेकेदाराने ओला-सुका कचरा अलग करून न देणाºया प्रत्येक विभागातील दहा नागरिकांची नावे कळविण्याचा फतवा काढल्याचे समजते. संबंधित नागरिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घंटागाडीचा ठेका देण्यात आला त्यावेळी करण्यात आलेल्या करारनाम्यातच घनकचरा विलगीकरणाची अट घालण्यात आलेली आहे. ठेका दिल्यानंतर वर्षभराने संबंधित ठेकेदारांना घनकचरा विलगीकरण न करणाºया नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे करारनाम्यानुसारच ठेकेदारांना नागरिकांची नावे कळविण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे घंटागाडी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये संघर्ष उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच ठेकेदारही सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका