शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:16 IST

शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यासाठी रोज दहा नागरिकांची नावे घंटागाडी ठेकेदारांना देण्याचा फतवा काढल्याचे समजते. निष्क्रिय आरोग्य विभागाने नागरिकांच्या प्रबोधनाबाबत काहीही उपाययोजना न राबविता घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

नाशिक : शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यासाठी रोज दहा नागरिकांची नावे घंटागाडी ठेकेदारांना देण्याचा फतवा काढल्याचे समजते. निष्क्रिय आरोग्य विभागाने नागरिकांच्या प्रबोधनाबाबत काहीही उपाययोजना न राबविता घंटागाडी ठेकेदा रांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.  घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रत्येक नागरिकाने ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकायचा आहे. शिवाय, ठेकेदारानेही विलगीकरण करूनच तो खतप्रकल्पावर न्यायचा आहे. शहरात सद्यस्थितीत घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण अवघे ३० टक्के असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी काही विभागात घंटागाडी ठेकेदारांमार्फत ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नागरिकांना हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते. परंतु, ठराविक नागरिकांपर्यंतच हा उपक्रम पोहोचला. त्यानंतर आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा विलगीकरणासाठी शहरातील व्यापारी पेठात हिरव्या आणि निळ्या रंगांच्या डस्टबिन बसविल्या. परंतु, या डस्टबिन खरेदीतील घोटाळा समोर आला. त्याबाबत प्रशासनाने मात्र, कुठलीही चौकशी केलेली नाही. आता ३१ मार्चअखेर घनकचरा विलगीकरण बंधनकारक केले असून, ते उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे. महापालिकेचा निष्क्रिय आरोग्य विभाग मात्र, त्याबाबत प्रबोधनपर उपाययोजना राबविण्यात कमी पडत आहे. त्यामुळेच प्रशासनाने आता घंटागाडी ठेकेदारांवर दबाव वाढविला असून, घंटागाडी ठेकेदाराने ओला-सुका कचरा अलग करून न देणाºया प्रत्येक विभागातील दहा नागरिकांची नावे कळविण्याचा फतवा काढल्याचे समजते. संबंधित नागरिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घंटागाडीचा ठेका देण्यात आला त्यावेळी करण्यात आलेल्या करारनाम्यातच घनकचरा विलगीकरणाची अट घालण्यात आलेली आहे. ठेका दिल्यानंतर वर्षभराने संबंधित ठेकेदारांना घनकचरा विलगीकरण न करणाºया नागरिकांकडून दंड वसूल करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे करारनाम्यानुसारच ठेकेदारांना नागरिकांची नावे कळविण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे घंटागाडी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये संघर्ष उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच ठेकेदारही सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका