शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 01:10 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असल्याने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असल्याने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होत असताना नाशिकमध्ये मालेगावातील साकोरा तसेच नांदगाव आणि मनमाडमध्ये अतिवृष्टी झाली. नाशिक शहरात मात्र त्या तुलनेत कमी पाऊस असून रात्री किंवा सकाळी पावसाची रिपरिप सुरू असते आणि सायंकाळी पुन्हा पाऊस होतो. मात्र हे प्रमाण फार नाही. मात्र, गणेशोत्सव सुरू होऊन दुसरा दिवस सुरू होताच, पावसानेही आपली हजेरी कायम ठेवली. शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी काही वेळ कोसळलेल्या पावसाने रात्रीतून अधून मधून हजेरी लावली. मात्र, शनिवारी पहाटेपासूनच शहर व परिसराला झोडपून काढले. सकाळी दोन तास विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. सध्या गणेशोत्सव सुरू झाल्याने पावसाच्या संततधारेमुळे गणेश मंडळांची धावपळ उडाली. अनेकांनी मंडपाला प्लास्टिकची आच्छादने टाकली तर काही मंडळांच्या आरासवर ही त्याचा परिणाम झाला. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिक भ्रमंती करतात. शनिवार हा शासकीय सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी सायंकाळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठा ही लवकरच बंद झाल्या. पावसामुळे शहरातील मार्गावर पाणीच पाणी झाले आणि अनेक भागात नाले ही वाहू लागले आहेत.नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा वाढला असून तो आता ९४ टक्के इतका झाला आहे. नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.धरणातून विसर्ग होण्याची शक्यता...गंगापूर धरणातील साठा ९४ टक्के इतका असून रात्रीतून पाऊस झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून गोदापात्रात विसर्ग होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिक