शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

गंगापूर धरण भरले ९३ टक्के, ४२ हजार क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:17 IST

नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.

ठळक मुद्दे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यताआसारामबापु, गाडगे महाराज पुल पाण्याखालीसुयोजित गार्डन, रामवाडीत शिरले पाणीनासर्डी नदीवरील अनेक पुलांवरून पाणी

नाशिक-नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर कायम असून दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला जात असून सकाळी प्रारंभी २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो वाढवून ४२ हजार क्युसेक पाण्यात वाढवण्यात आला आहे. २००८ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले होते. त्यानंतर प्रथमच इतके पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने आनंदवल्लीचा जुना पुल, आसाराम बापु पुल, फॉरेस्ट्र नर्सरी, रामवाडी गाडगे महाराज पुल यासाह अन्य अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. कपालेश्वराच्या आठ पायऱ्या तर सरकारवाड्याच्या तीन पायºया पाण्याखाली गेल्या आहेत. फॉरेस्ट नर्सरी पुलाच्या परीसरत सुयोजित गार्डन, सामाजिक वनीकरणाची रोपवाटीका यात पाणी शिरले आहे. याशिवाय रामवाडी, गंगावाडी, सराफ बाजार येथे देखील पाणी शिरले आहे.उपनगरातही समस्यानासर्डी नदीला पुर आल्याने नाशिक शहरानजीकच्या तिरडशेत, पिंपळगाव बहुला परीसरात पाणी शिरले आहे. नासडी नदीला पाणी वाढल्याने उंटवाडी तसेच तिडके कॉलनीतील मिलींद नगर पुल पाण्याखाली गेला असल्याने संपर्क खंडीत झाला आहे. सीटी सेंटर मॉल चौकात पाणी साचल्याने देखील वाहतुक ठप्प झाली आहे.नाशिकरोडला रहीवाशांचे स्थलांतरनाशिकरोड देवळाली गाव परीसरात वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे रोकडोबावाडी येथील नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. देवळाली गाव तसेच विहीत गाव येथील दशक्रिया विधी शेड पाण्याखाली गेले आहे.भगुर शहरात नुकसानरात्रभरच्या पावसामुळे भगूर येथील क्रांती चौकातील रामदास कासारयांचे दोन रूमचे घर सकाळी पडले. यात जीवीत हानी झाली नसली तरी ६० ते ६५ हजाराचे नुकसान झाले आहे. या भागातील स्मशान भूमीत देखील पाणी शिरले आहे.वडाळा गाव पसिरात परिसरात पाणीवडाळागाव, साईनगर, विनय नगर, शिवाजीवाडी, भारत नगर या भागात पाणीच पाणी झाले आहे. नासर्डी नदीवरील शिवाजी वाडी तसेच पखाल रोडवरील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील संपर्क खंडीत झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसfloodपूर