शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गंगापूर धरण भरले ९३ टक्के, ४२ हजार क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:17 IST

नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.

ठळक मुद्दे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यताआसारामबापु, गाडगे महाराज पुल पाण्याखालीसुयोजित गार्डन, रामवाडीत शिरले पाणीनासर्डी नदीवरील अनेक पुलांवरून पाणी

नाशिक-नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर कायम असून दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला जात असून सकाळी प्रारंभी २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो वाढवून ४२ हजार क्युसेक पाण्यात वाढवण्यात आला आहे. २००८ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले होते. त्यानंतर प्रथमच इतके पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने आनंदवल्लीचा जुना पुल, आसाराम बापु पुल, फॉरेस्ट्र नर्सरी, रामवाडी गाडगे महाराज पुल यासाह अन्य अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. कपालेश्वराच्या आठ पायऱ्या तर सरकारवाड्याच्या तीन पायºया पाण्याखाली गेल्या आहेत. फॉरेस्ट नर्सरी पुलाच्या परीसरत सुयोजित गार्डन, सामाजिक वनीकरणाची रोपवाटीका यात पाणी शिरले आहे. याशिवाय रामवाडी, गंगावाडी, सराफ बाजार येथे देखील पाणी शिरले आहे.उपनगरातही समस्यानासर्डी नदीला पुर आल्याने नाशिक शहरानजीकच्या तिरडशेत, पिंपळगाव बहुला परीसरात पाणी शिरले आहे. नासडी नदीला पाणी वाढल्याने उंटवाडी तसेच तिडके कॉलनीतील मिलींद नगर पुल पाण्याखाली गेला असल्याने संपर्क खंडीत झाला आहे. सीटी सेंटर मॉल चौकात पाणी साचल्याने देखील वाहतुक ठप्प झाली आहे.नाशिकरोडला रहीवाशांचे स्थलांतरनाशिकरोड देवळाली गाव परीसरात वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे रोकडोबावाडी येथील नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. देवळाली गाव तसेच विहीत गाव येथील दशक्रिया विधी शेड पाण्याखाली गेले आहे.भगुर शहरात नुकसानरात्रभरच्या पावसामुळे भगूर येथील क्रांती चौकातील रामदास कासारयांचे दोन रूमचे घर सकाळी पडले. यात जीवीत हानी झाली नसली तरी ६० ते ६५ हजाराचे नुकसान झाले आहे. या भागातील स्मशान भूमीत देखील पाणी शिरले आहे.वडाळा गाव पसिरात परिसरात पाणीवडाळागाव, साईनगर, विनय नगर, शिवाजीवाडी, भारत नगर या भागात पाणीच पाणी झाले आहे. नासर्डी नदीवरील शिवाजी वाडी तसेच पखाल रोडवरील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील संपर्क खंडीत झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसfloodपूर