शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गंगापूर धरण @ ९० टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:40 IST

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणात ९० टक्के जलसाठा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात ९२ टक्के पाणी साठल्याने शहरावर घोंगावणारे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. गुरुवारपासून जिल्ह्यात जोरदार सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरीत पहाटेपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची कार्यवाही केली, परिणामी गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. असाच प्रकार दारणा धरणाच्याबाबत घडल्यामुळे तेथूनही विसर्ग करण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ११ टीएमसी पाणी पोहोचले होते.  परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही जेमतेम साठा असल्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गुरूवारी दिवसभर हजेरी कायम ठेवली व विशेष करून विशेष करून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातील गंगापूर येथे ८६, कश्यपि ४५, गौतमी ४५, त्र्यंबकेश्वर ४६ व आंबोली येथे ९३ मिली मीटर पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालिची वाढ झाली. शुक्रवारी सकाळपासूनही पावसाने सातत्य राखल्यामुळे सकाळी दहा वाजता गंगापूर धरणातून १०१२ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.  गंगापूर धरण समुहातील गंगापूर, कश्यपि, गौतमी गोदावरी व आळंदी या चार धरणाची साठवण क्षमता १०३२० दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी १७ आॅगष्ट रोजी ९४४४ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले होते. यंदामात्र त्यात वाढ होवून ९५२५ दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे. त्याची टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे.पावसाचे पुनरागमन, जनजीवन विस्कळीत  गेल्या काही आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने नाशिकमध्ये पुन्हा हजेरी लावली असून, शहरात तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संतत आधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास महिनाभरानंतर पुनरागमन झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून, तपमानातही लक्षणीय घट झाली आहे.  नाशिक शहरात गेल्या २४ तासांत ३५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर सकाळी साडेआठ वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.६ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या २४ तासांत गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध नाल्यांसह नासार्डी व गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरातील सखल भागात विविध ठिकाणी पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्यानंतर रस्त्यावरील वाहतूकही विरळ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पावसासह अधून-मधून जोरदार सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा पसरला असून, तपमानाचा कमाल पारा २४ अंशांपर्यंत घसरला आहे.सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दीगेल्या महिनाभरापासून विश्रांती घेतेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने गोदावरीची पाणी पातळी वाढली असून, गंगापूर धरणही ९० टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सोमेश्वर धबधबा पुन्हा खळाळून वाहू लागल्याने नाशिककरांसह बाहेरून येणाºया पर्यटकांनी सोमेश्वर धबधब्यावर पावसाची मौज घेण्यासाठी गर्दी केली होती. 

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणी