शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मंजूर नसलेल्या पदांवर डॉक्टरांच्या भरतीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:19 IST

नाशिक : किडनी, कॅन्सर व हृदयरोग या गंभीर आजारांवर गोरगरिबांना नाममात्र दरात उपचार घेता यावे यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च ...

ठळक मुद्देसंदर्भ सेवा : भरतीआड शासनाची फसवणूक

नाशिक : किडनी, कॅन्सर व हृदयरोग या गंभीर आजारांवर गोरगरिबांना नाममात्र दरात उपचार घेता यावे यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अनागोंदी कारभारातील गंभीर बाबी दिवसाआड उघडकीस येत असून, हाड, स्त्रीरोग व बालरोगावर या रुग्णालयात उपचाराची पुरेशी व्यवस्था व त्यासाठी तज्ज्ञांची पदे मंजूर नसतानाही गेल्या काही वर्षांपासून या पदांसाठी डॉक्टरांची भरती करण्याचा व त्यांच्या वेतनावर दरमहा लाखो रुपये खर्ची पाडण्याचा प्रकार माहिती अधिकारातून स्पष्ट झाला आहे. मंजूर नसलेली पदे भरण्यामागची कारणे समजू शकली नसली तरी, त्यातून शासनाचीच अप्रत्यक्ष फसवणूक करण्यात आल्याचे उघड उघड दिसू लागले आहे.गोरगरिब रुग्णांवर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन महागडे उपचार करण्याची वेळ येऊ नये यासाठीच नाशकात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. विशेष करून कॅन्सर, हृदयरोग व किडनी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, उपचारात कोठेही कमतरता राहू नये, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जात असल्याने अनेक रुग्णांना आजवर जीवदान मिळाले आहे. अन्य आजारांवर उपचारासाठी शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था बळकट केल्यामुळे याठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांवर नियमित निदान व उपचार केले जात आहेत. असे असतानाही विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यामागचे कोडे या क्षेत्रातील जाणकारांना अजूनही उलगडलेले नाही.अलीकडेच विचारलेल्या माहिती अधिकारात संदर्भ सेवेने दिलेल्या लेखी उत्तरात रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञांची पदे मंजूर नसल्याचे म्हटले आहे. ही पदेच मंजूर नसल्यामुळे या पदांवरील नियुक्त केलेल्या डॉक्टरांनी किती रुग्णांवर आजवर उपचार केले व किती रुग्ण बरे होऊन घरी गेले याची माहितीही रुग्णालयाकडे नसल्याचा छातीठोक दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या सात वर्षांपासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. खिरारी, पाच वर्षांपासून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजय कुटे व सहा वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ डॉ. कांचन यांची रुग्णालय व्यवस्थापनाने नियुक्ती केली आहे व ते आजही त्यांची सेवा (?) रुग्णालयात येणाºया रुग्णांना देत आहेत.लाखो रुपयांचे पॅकेज देण्याचा पायंडाविशेष म्हणजे अस्थिरोगावर उपचाराची कोणतीही आवश्यक व पुरेशी साधने रुग्णालयात नसतानाही अस्थिरोग तज्ज्ञ गेल्या पाच वर्षांपासून रुग्णांची सेवा करीत असल्याची बाब अधिकच आश्चर्यकारक मानली जात असून, रुग्णालयाचे विद्यमान वैद्यकीय अधीक्षक स्वत: अस्थिरोगतज्ज्ञ असूनही सदरचे पद भरण्याचे कारणच काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे पदे मंजूर नसल्याची कबुली द्यायची व दुसरीकडे तज्ज्ञांची नियुक्ती करून त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज देण्याचा पायंडा संदर्भ सेवा रुग्णालयाने पाडून एकप्रकारे त्या माध्यमातून शासनाची फसवणूकच केल्याचे मानले जात आहे.आरोग्य संचालकांचे दुर्लक्षपदे मंजूर नसणे व रुग्णालयात पुरेशा उपचाराची व्यवस्था नसूनही अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची संदर्भ सेवा रुग्णालयात भरती करण्याच्या या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य संचालकांनाही अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. बुधवारी आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी संदर्भ सेवा रुग्णालयाच्या झाडाझडतीतही सदरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास न येऊ देण्याची तजवीज घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य