शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:28 IST

जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी (दि.२१) त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस सुरू असताना सोमवारी (दि.२२) मात्र सहा तालुक्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू होता. अनेक तालुक्यांमध्ये तर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. हवामान खात्याचे सर्व अंदाज गुंडाळून जिल्ह्णात पावसाचा सुरू असलेला खेळ धरणाच्या पाण्याची चिंता वाढविणारा ठरत आहे.जिल्ह्णात उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे पावसाची अनिश्चितता अजूनही कायम आहे. गेल्या दि. ७ आणि ८ जुलै रोजी जिल्ह्णात सर्वदूर झालेल्या पावसामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले होते. दुष्काळाची झळ सोसणाºया तालुक्यांमध्येही पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले वाहू लागले तर दोनच दिवसांच्या पावसाने धरणांची पातळीदेखील वाढली. आता पावसाने जोर धरला असे वाटत असताना पुन्हा दडून बसलेल्या पाऊन अधूनमधून डोकावत असतो तर कधी जोरदार हजेरी लावून दडत आहे. जिल्ह्णात पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र शेतकरी पीकाविषयी साशंकदेखील झाले आहेत. पेरणीसाठी पूरक असलेला पाऊस झाल्यामुळे एकीकडे समाधान असले तरी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका याच पिकांच बसू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्येदेखील पावसाची अनिश्चितता कायम आहे. इगतपुरीत २५ ते ५५ मि.मी. असा बरसणारा पाऊस गेल्या दोन दिवसांपासून १२ ते १५ मि.मी. नोंदला जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या आठवड्यापासून, तर त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाने काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अपेक्षित पाऊस होऊ न शकल्याने पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोडही झाला. या महिनाभरात त्र्यंबकेश्वरसह धरणक्षेत्रात देखील पाऊस नसल्यामुळे जुलैच्या मध्यावरच त्र्यंबकला निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील व्यापार, व्यावसायिकांमध्ये चिंता दिसून आली.रविवारी पावसाचे दान; सोमवारी ठणठणाटरविवार (दि.२१) रोजी चोवीस तासांत जिल्ह्णात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सर्वच सर्व ठिकाणी बरसलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात चांगलीच धावपळ झाली. दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येही पाऊस झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असताना सोमवारी मात्र सहा तालुक्यांत पावसाचा थेंबडी होऊ शकला नाही. रविवारी सिन्नरमध्ये १७ मि.मी. पाऊस झाला, तर सोमवारी केवळ ५ मि.मी. चांदवडला ६१ मि.मी. बरसल्या पावसाने सोमवारी अक्षरश: दांडी मारली. हीच परिस्थिती येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण आणि सुरगाणा येथील आहे.या ठिकाणी समोवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाऊसच होऊ शकला नाही. या उलट रविवारी येवल्यात ६७, देवळा ४४, नांदगाव ४५, मालेगाव ९२, बागलाण ३३, कळवण ३६ मि.मी., तर इतका पाऊस बरसला असताना दुसºया दिवशी टिपूसही बरसला नाही. मालेगावमध्ये सर्वाधिक ९२ मि.मी. इतका चांगला दमदार पाऊस बरसला मात्र दुसºयातर दिवशी तालुक्यात कुठेही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती