शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जिल्ह्यात लहरी पावसाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:28 IST

जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असे वाटत असतानाच मध्येच दडून बसणारा पाऊस, तर कधी धो-धो बरसणाऱ्या तालुक्यात दुसºया दिवशी लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी (दि.२१) त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस सुरू असताना सोमवारी (दि.२२) मात्र सहा तालुक्यांमध्ये केवळ रिमझिम पाऊस सुरू होता. अनेक तालुक्यांमध्ये तर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. हवामान खात्याचे सर्व अंदाज गुंडाळून जिल्ह्णात पावसाचा सुरू असलेला खेळ धरणाच्या पाण्याची चिंता वाढविणारा ठरत आहे.जिल्ह्णात उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे पावसाची अनिश्चितता अजूनही कायम आहे. गेल्या दि. ७ आणि ८ जुलै रोजी जिल्ह्णात सर्वदूर झालेल्या पावसामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले होते. दुष्काळाची झळ सोसणाºया तालुक्यांमध्येही पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले वाहू लागले तर दोनच दिवसांच्या पावसाने धरणांची पातळीदेखील वाढली. आता पावसाने जोर धरला असे वाटत असताना पुन्हा दडून बसलेल्या पाऊन अधूनमधून डोकावत असतो तर कधी जोरदार हजेरी लावून दडत आहे. जिल्ह्णात पावसाच्या या लहरीपणामुळे मात्र शेतकरी पीकाविषयी साशंकदेखील झाले आहेत. पेरणीसाठी पूरक असलेला पाऊस झाल्यामुळे एकीकडे समाधान असले तरी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका याच पिकांच बसू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्येदेखील पावसाची अनिश्चितता कायम आहे. इगतपुरीत २५ ते ५५ मि.मी. असा बरसणारा पाऊस गेल्या दोन दिवसांपासून १२ ते १५ मि.मी. नोंदला जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या आठवड्यापासून, तर त्र्यंबकेश्वरमध्येही पावसाने काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी अपेक्षित पाऊस होऊ न शकल्याने पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोडही झाला. या महिनाभरात त्र्यंबकेश्वरसह धरणक्षेत्रात देखील पाऊस नसल्यामुळे जुलैच्या मध्यावरच त्र्यंबकला निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील व्यापार, व्यावसायिकांमध्ये चिंता दिसून आली.रविवारी पावसाचे दान; सोमवारी ठणठणाटरविवार (दि.२१) रोजी चोवीस तासांत जिल्ह्णात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सर्वच सर्व ठिकाणी बरसलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात चांगलीच धावपळ झाली. दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येही पाऊस झाल्यामुळे समाधान व्यक्त होत असताना सोमवारी मात्र सहा तालुक्यांत पावसाचा थेंबडी होऊ शकला नाही. रविवारी सिन्नरमध्ये १७ मि.मी. पाऊस झाला, तर सोमवारी केवळ ५ मि.मी. चांदवडला ६१ मि.मी. बरसल्या पावसाने सोमवारी अक्षरश: दांडी मारली. हीच परिस्थिती येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण आणि सुरगाणा येथील आहे.या ठिकाणी समोवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाऊसच होऊ शकला नाही. या उलट रविवारी येवल्यात ६७, देवळा ४४, नांदगाव ४५, मालेगाव ९२, बागलाण ३३, कळवण ३६ मि.मी., तर इतका पाऊस बरसला असताना दुसºया दिवशी टिपूसही बरसला नाही. मालेगावमध्ये सर्वाधिक ९२ मि.मी. इतका चांगला दमदार पाऊस बरसला मात्र दुसºयातर दिवशी तालुक्यात कुठेही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती