शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

विभागातील जलयुक्त कामांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:46 IST

राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रगतिपथावर असलेली उत्तर महाराष्टÑातील दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आली आहे. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे यापुढील काळात प्रगतिपथावर अर्थात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

नाशिक : राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रगतिपथावर असलेली उत्तर महाराष्टÑातील दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आली आहे. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे यापुढील काळात प्रगतिपथावर अर्थात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. रोजगार हमी किंवा अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून कामे करावी लागेल किंवा प्रसंगी कामे आहे त्या स्थितीत सोडून देण्याची वेळही येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.उत्तर महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियान २०१८-१९ अंतर्गत ११२२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमधून एकूण १९,८४२ गावांमध्ये जलयुक्तची कामे मागीलवर्षी हाती घेण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय निधीची तरतूद तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. परंतु आता या कामांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकराने या कामांनासाठी निधीची तरतूद केलेली नाही. किंबहूना या कामांसाठी कोणत्याही अधिकाºयाने जलयुक्तच्या कामासाठी निधीची तरतूद करू नये, असे आदेश केले आहेत. त्यामुळे उर्वरित कामांचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्णात ९८, धुळे जिल्ह्णात ८६, तर नगर जिल्ह्णात ९९ टक्के जलयुक्त शिवारची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. मात्र नंदुरबार आाणि जळगाव तुलनेत कामांची टक्केवारी कमी असून नंदुरबारला ७६, तर जळगावला ८२ टक्के इतकेच काम झालेले आहे. नंदुरबारला ५४० कामे अजूनही प्रगतिपथावर असून, जळगावला ७५७ कामांची प्रगती दाखविण्यात आलेली आहे. याचाच अर्थ या कामांचा निधी दि. ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर या कामांना ब्रेक लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीGovernmentसरकार