शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

विभागातील जलयुक्त कामांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:46 IST

राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रगतिपथावर असलेली उत्तर महाराष्टÑातील दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आली आहे. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे यापुढील काळात प्रगतिपथावर अर्थात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

नाशिक : राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रगतिपथावर असलेली उत्तर महाराष्टÑातील दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आली आहे. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे यापुढील काळात प्रगतिपथावर अर्थात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. रोजगार हमी किंवा अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून कामे करावी लागेल किंवा प्रसंगी कामे आहे त्या स्थितीत सोडून देण्याची वेळही येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.उत्तर महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियान २०१८-१९ अंतर्गत ११२२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमधून एकूण १९,८४२ गावांमध्ये जलयुक्तची कामे मागीलवर्षी हाती घेण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय निधीची तरतूद तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. परंतु आता या कामांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकराने या कामांनासाठी निधीची तरतूद केलेली नाही. किंबहूना या कामांसाठी कोणत्याही अधिकाºयाने जलयुक्तच्या कामासाठी निधीची तरतूद करू नये, असे आदेश केले आहेत. त्यामुळे उर्वरित कामांचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्णात ९८, धुळे जिल्ह्णात ८६, तर नगर जिल्ह्णात ९९ टक्के जलयुक्त शिवारची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. मात्र नंदुरबार आाणि जळगाव तुलनेत कामांची टक्केवारी कमी असून नंदुरबारला ७६, तर जळगावला ८२ टक्के इतकेच काम झालेले आहे. नंदुरबारला ५४० कामे अजूनही प्रगतिपथावर असून, जळगावला ७५७ कामांची प्रगती दाखविण्यात आलेली आहे. याचाच अर्थ या कामांचा निधी दि. ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर या कामांना ब्रेक लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीGovernmentसरकार