शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

विभागातील जलयुक्त कामांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:46 IST

राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रगतिपथावर असलेली उत्तर महाराष्टÑातील दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आली आहे. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे यापुढील काळात प्रगतिपथावर अर्थात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

नाशिक : राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रगतिपथावर असलेली उत्तर महाराष्टÑातील दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात आली आहे. सदर योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे यापुढील काळात प्रगतिपथावर अर्थात अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. रोजगार हमी किंवा अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून कामे करावी लागेल किंवा प्रसंगी कामे आहे त्या स्थितीत सोडून देण्याची वेळही येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.उत्तर महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियान २०१८-१९ अंतर्गत ११२२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमधून एकूण १९,८४२ गावांमध्ये जलयुक्तची कामे मागीलवर्षी हाती घेण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय निधीची तरतूद तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. परंतु आता या कामांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकराने या कामांनासाठी निधीची तरतूद केलेली नाही. किंबहूना या कामांसाठी कोणत्याही अधिकाºयाने जलयुक्तच्या कामासाठी निधीची तरतूद करू नये, असे आदेश केले आहेत. त्यामुळे उर्वरित कामांचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्णात ९८, धुळे जिल्ह्णात ८६, तर नगर जिल्ह्णात ९९ टक्के जलयुक्त शिवारची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. मात्र नंदुरबार आाणि जळगाव तुलनेत कामांची टक्केवारी कमी असून नंदुरबारला ७६, तर जळगावला ८२ टक्के इतकेच काम झालेले आहे. नंदुरबारला ५४० कामे अजूनही प्रगतिपथावर असून, जळगावला ७५७ कामांची प्रगती दाखविण्यात आलेली आहे. याचाच अर्थ या कामांचा निधी दि. ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर या कामांना ब्रेक लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीGovernmentसरकार